Homeताज्या बातम्याएमआयडीसीचा पाणी पुरवठा पुढील आठवड्यात २४ तास बंद

एमआयडीसीचा पाणी पुरवठा पुढील आठवड्यात २४ तास बंद

कल्याण:- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी गुरूत्व वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात १८ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या महत्वाच्या कामासाठी या गुरूत्व जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.त्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होणारी गावे, परिसरातील गावांना होणारा पाणी पुरवठा पुढील आठवड्यात गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या कालावधीत बंद राहणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापत्य अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे. बारवी धरणातून येणारे पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळ एमआयडीसीकडून उचलले जाते. हे कच्चे पाणी जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवहिन्यांद्वारे बदलापूर, अंबरनाथ निवासी, औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली पालिका, नवी मुंबई, तळोजा औद्योगिक क्षेत्र, ठाणे, कळवा, मुंब्रा परिसराला पाणी पुरवठ्यासाठी दैनंदिन वितरित केले जाते.बारवी जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशयातील बारवी गुरूत्ववाहिनीच्या एक ते तीन वाहिनींचे उन्नत्तीकरण आणि तातडीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी एमआयडीसीने प्रस्तावित केले होते. परंतु या कालावधीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने एमआयडीसीला या कालावधीत गुरुवत्व वाहिनी दुरुस्तीचे काम करता आले नव्हते. त्यामुळे या कालावधीत घेण्यात आलेला पाणी पुरवठ्यासाठीचा बंद एमआयडीसीने रद्द केला होता.

आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या महिन्यात प्रस्तावित केलेले बारवी गुरुत्ववाहिनी देखभाल दुरुस्ती आणि उन्नत्तीकरणाचे काम एमआयडीसीने १८ सप्टेंबर, गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार, १९ सप्टेंबर रात्री १२ या कालावधीत करण्याचे नियोजन केले आहे. या चोवीस तासाच्या कालावधीत जलवाहिन्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा होणाऱ्या बदलापूर नगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर पालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होणारी गावे, अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण भागातील गावांना होणारा पाणी पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका, गृहसंकुले आणि नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा करून ठेवण्याचे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

बंद असेल त्या काळात उद्योजक एक दिवस पुरेल इतका पाणी साठा आपल्या कंपनी आवारात खासगी टँकरच्या माध्यमातून साठा करून ठेवतात. त्यामुळे उद्योजक या बंदच्या काळात आपल्या कंपनीतील उत्पादन सुरू ठेवतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...
error: Content is protected !!