Homeताज्या बातम्यामुंबईकरांना फुटणार घाम! येत्या दोन दिवसात उकाडा अन् वादळी पाऊसही; हवामान विभागाचा...

मुंबईकरांना फुटणार घाम! येत्या दोन दिवसात उकाडा अन् वादळी पाऊसही; हवामान विभागाचा इशारा

ब्रेकिंग न्यूज
लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई; ई-केवायसी न केलेल्या १४ लाख महिलांचा लाभ धोक्यातपळसदरी धरण परिसरात दुर्दैवी घटना; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यूअकृषिक रूपांतरण प्रक्रिया आता ऑनलाइन; बीपीएमएस प्रणाली सुरूचेन्नई सुपर किंग्सला दुखापतींचा फटका; आयुष म्हात्रे स्पर्धेबाहेरमुंबईकरांना फुटणार घाम! येत्या दोन दिवसात उकाडा अन् वादळी पाऊसही; हवामान विभागाचा इशाराएकनाथ शिंदेच्या ठाण्याची धुरा योगेश कदमांकडे; जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे ‘ॲक्टिव्ह’ मोडवर.पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहेपीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवेहैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरणनळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहत रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी पुरवठा सर्वेक्षणाची मागणी

मुंबई : सध्या वाढत्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांसमोर आता दुहेरी संकट उभे राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने पुढील दोन दिवस मुंबई सोबतच ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण व दमट हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.

या बदलत्या हवामानामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार असून नागरिकांना प्रचंड घाम आणि चिकटपणाचा त्रास सहन करावा लागू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ आणि २३ एप्रिल रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळी गडगडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र या पावसामुळे गारवा मिळण्याऐवजी वातावरणातील आर्द्रता वाढून उकाडा अधिकच जाणवणार आहे.

ठाणे जिल्ह्यावर याचा विशेष परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसभर कडक ऊन आणि त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढणार असून नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः बदलापूर परिसरात दुपारच्या वेळेस तीव्र उकाडा आणि संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी अशी परिस्थिती राहू शकते, ज्यामुळे उष्णता आणि दमटपणाचा दुहेरी त्रास जाणवेल.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात सुरुवातीला हवामान कोरडे राहणार असले तरी २४ एप्रिलपासून तिथेही ढग दाटून येण्यास सुरुवात होईल आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार दिवसा कडक ऊन पडेल, तर दुपारी किंवा संध्याकाळी ढग दाटून येऊन काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. अशी स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. आर्द्रता वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबणे, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई; ई-केवायसी न केलेल्या १४ लाख महिलांचा लाभ धोक्यात

0
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व लाभार्थ्यांची निकषांनुसार तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ई-केवायसी प्रक्रिया...

पळसदरी धरण परिसरात दुर्दैवी घटना; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

0
कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून २० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे...

अकृषिक रूपांतरण प्रक्रिया आता ऑनलाइन; बीपीएमएस प्रणाली सुरू

0
मुंबई : राज्यातील जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रूपांतरण प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इमारत परवानगी...

चेन्नई सुपर किंग्सला दुखापतींचा फटका; आयुष म्हात्रे स्पर्धेबाहेर

0
चेन्नई सुपर किंग्स साठी इंडियन प्रीमियर लीग २०२६ हंगाम आव्हानात्मक ठरत आहे. आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांत पराभव पत्करल्याने संघावर दबाव वाढला आहे....

एकनाथ शिंदेच्या ठाण्याची धुरा योगेश कदमांकडे; जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे ‘ॲक्टिव्ह’ मोडवर.

0
ठाणे : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले...

लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई; ई-केवायसी न केलेल्या १४ लाख महिलांचा लाभ धोक्यात

0
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व लाभार्थ्यांची निकषांनुसार तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ई-केवायसी प्रक्रिया...

पळसदरी धरण परिसरात दुर्दैवी घटना; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

0
कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून २० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे...

अकृषिक रूपांतरण प्रक्रिया आता ऑनलाइन; बीपीएमएस प्रणाली सुरू

0
मुंबई : राज्यातील जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रूपांतरण प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इमारत परवानगी...

चेन्नई सुपर किंग्सला दुखापतींचा फटका; आयुष म्हात्रे स्पर्धेबाहेर

0
चेन्नई सुपर किंग्स साठी इंडियन प्रीमियर लीग २०२६ हंगाम आव्हानात्मक ठरत आहे. आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांत पराभव पत्करल्याने संघावर दबाव वाढला आहे....

एकनाथ शिंदेच्या ठाण्याची धुरा योगेश कदमांकडे; जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे ‘ॲक्टिव्ह’ मोडवर.

0
ठाणे : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले...
error: Content is protected !!