बदलापूर(प्रतीक टोपले):पावसाचा जोर कमी झाल्यामुळे बदलापूर ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांनी भात कापणीला आता सुरुवात केली आहे.
बदलापूर शहराच्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते. यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी पासूनच संघर्ष करायला लागले. त्यामुळे यंदा भात कापणी लांबणीवर पडली होती पण आता काही दिवसांपासून चांगले ऊन पडत असल्यामुळे शेतकरी कापणीसाठी शेतात उतरले आहेत.
पावसाच्या व्यवस्थेनुसार बदलापुरातील शेतकरी कापणीची घाई करताना दिसत आहेत.
कापणी.
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये भाताचे दाणे पूर्णपणे पक्व झाल्यावर शेतकरी कापणीला सुरुवात करतात. भात कापणीच्या वेळी शेतकरी विळ्याच्या सहाय्याने भात कापायला सुरुवात करतो. विलेच्या सहाय्याने कापलेला भात त्याच शेतामध्ये दोन ते तीन दिवस सूर्यप्रकाशात सुकण्यासाठी ठेवला जातो. सुकलेला भात गोळा करून त्याचे भारे बांधले जातात व एका ठिकाणी साठवले जातात. साठलेला भात हा जोडला जातो. झोडल्यावर दाणे वेगळे होतात व ते गिरणीमध्ये जाण्यासाठी तयार असतात. साठवणे आणि झोडणे ही प्रक्रिया कापणी नंतरची असते.























