बदलापूर:बदलापूर शहरातील नागरिक काही दिवसांपासून पाणी, वीज तर कधी प्रदूषणाच्या समस्येमुळे संतापले आहेत. काही दिवसांपूर्वीच बदलापूरकरांना पाणीकपात सहन करायला लागली होती. त्यात आता संतापलेल्या नागरिकांना एम एस सी बी आणि अदानी समूहाच्या अनोख्या युतीचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या समस्या
बदलापूर शहरात लाखो नागरिक राहतात. प्रत्येक घरास स्वातंत्र्य विजेचा मिटर आहे. त्या मिटर वर युनिट पडतात त्यावरून आपल्याला बिल मिळतो.शहरामध्ये काही ठिकाणी जेष्ठ नागरिक पण राहतात. जेष्ठ नागरिक वयवृद्ध झाल्यामुळे ते काय जास्त घरामध्ये राहत नाही म्हणजे नातेवाईकांकडे किंवा कुठे तरी तीर्थक्षेत्रात फिरायला जात असतात. त्याच्यामुळे त्यांच्या घरात काय जास्त विजेचा वापर होत नाही. म्हणून त्यांच्या विजेच्या मिटरमध्ये युनिट कमी प्रमाणात पडतात त्याच्यामुळे त्यांना बिल कमी प्रमाणात येते. असे सांगून सुद्धा जबरदस्ती करून मिटर मध्ये काही दोष नसतांना देखील मिटर खराब आहे असं बोलून अदानी कंपनीचे कर्मचारी MSCB च्या नावाखाली मीटर बदलतात.
कित्तेक वेळी नागरिकांकडून असही ऐकण्यात आलय की आमचे ऑफिस, दुकान, गाळे इत्यादी काही महिने बंद आहेत. त्याच्यामुळे मिटरमध्ये जास्त युनिट पडत नाही म्हणून आम्हाला बिल कमी येतो. असे सांगून सुद्धा अदानी कंपनीचे कर्मचारी MSCB च्या नावाखाली मीटर बदलतात.
काही ठिकाणी असं देखील घडलंय की कोणतीही पुरवसूचना न देता डायरेक्ट मिटर बदलले जात आहेत. अदानी कंपनीच्या लाजिर्वानी कृत्यामुळे बदलापूर शहरातील नागरिक संतापले आहेत.
काही नागरिक बोलतात जेव्हा पासून अदानी कंपनीचे कर्मचारी मिटर बदलून गेलेत तेव्हापासून विजेच्या बिलामध्ये देखील वाढ झाली आहे त्यामुळे गोरगरीब जनतेला याचा चांगलाच फटका मिळत आहे.
काही ठिकाणी जुन्या मीटरमध्ये कुठलीही समस्या नसताना सुद्धा मिटर बदलले जात आहेत त्यामुळे बदलापूर शहरातील नागरिकांना बिन कामाचा आर्थिक भार सहन करावा लागतोय.
सत्यस्थिती
अदानी कंपनी आणि MSCB चे मिटर रीडर यांच्यात हातमीलावणी झाली आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे. ज्या ज्या ठिकाणी मिटर चालू आहेत परंतु विजेचा कमी वापर असल्याने त्या मिटर मध्ये कमी युनिट पडतात. कित्तेक ठिकाणी असे पण सांगण्यात येते की काही महिन्यांपासून आमचे ऑफिस, गाळे, दुकान बंद आहेत परंतु आमचे मिटर चालू आहेत अश्या ठिकाणी MSCB चे “मिटर रीडर” जानुगुजून पोहचत नाहीत. त्यामुळे बिलावर युनिट पडत नाही त्याचाच फायदा घेऊन अदानी कंपनीचे कर्मचारी MSCB च्या नावाखाली तिकडे पोहचून मिटर चांगला असून सुद्धा मिटर बदली करतात. अश्या प्रकारे अदानी कंपनीद्वारे शहरामध्ये ही लूटमार सुरु आहे.
कंपनीला होणारा फायदा
जुने मिटर योग्यरीत्या चालू असूनसुद्धा MSCB च्या नावाखाली अदानी कंपनीची जी लूटमार चालू आहे त्यामध्ये प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावा अशी मागणी बदलापूर शहरातील नागरिक करीत आहेत.























