Homeताज्या बातम्यामुंबईकरांना फुटणार घाम! येत्या दोन दिवसात उकाडा अन् वादळी पाऊसही; हवामान विभागाचा...

मुंबईकरांना फुटणार घाम! येत्या दोन दिवसात उकाडा अन् वादळी पाऊसही; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : सध्या वाढत्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांसमोर आता दुहेरी संकट उभे राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने पुढील दोन दिवस मुंबई सोबतच ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण व दमट हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.

या बदलत्या हवामानामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार असून नागरिकांना प्रचंड घाम आणि चिकटपणाचा त्रास सहन करावा लागू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ आणि २३ एप्रिल रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळी गडगडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र या पावसामुळे गारवा मिळण्याऐवजी वातावरणातील आर्द्रता वाढून उकाडा अधिकच जाणवणार आहे.

ठाणे जिल्ह्यावर याचा विशेष परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसभर कडक ऊन आणि त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढणार असून नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः बदलापूर परिसरात दुपारच्या वेळेस तीव्र उकाडा आणि संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी अशी परिस्थिती राहू शकते, ज्यामुळे उष्णता आणि दमटपणाचा दुहेरी त्रास जाणवेल.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात सुरुवातीला हवामान कोरडे राहणार असले तरी २४ एप्रिलपासून तिथेही ढग दाटून येण्यास सुरुवात होईल आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार दिवसा कडक ऊन पडेल, तर दुपारी किंवा संध्याकाळी ढग दाटून येऊन काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. अशी स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. आर्द्रता वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबणे, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मॉर्फ केलेले फोटो ऑनलाईन टाकणाऱ्या हिंजवडीतील एका व्यक्तीला पाच लाखांची मागणी करून अटक

0
पुणे : रावेत पोलिसांनी रविवारी हिंजवडी येथील एका प्लेसमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्याला एका ओळखीच्या मंगेतराचे आणि आईचे मॉर्फ केलेले फोटो अनेक अश्लील वेबसाइटवर पोस्ट केल्याप्रकरणी...

रोखीने त्रस्त असलेल्या पुणे कॅन्टने 120 वर्षे जुन्या एमजी रोड इमारतीचे व्यावसायिक रूपांतर करण्याची...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (PCB) एमजी रोडवरील ऐतिहासिक मुख्यालय पुन्हा व्यावसायिक उपक्रमात बदलून सध्याचे आर्थिक संकट दूर करण्याचा विचार करत आहे.120 वर्षांहून अधिक काळाचा...

लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई; ई-केवायसी न केलेल्या १४ लाख महिलांचा लाभ धोक्यात

0
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व लाभार्थ्यांची निकषांनुसार तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ई-केवायसी प्रक्रिया...

पळसदरी धरण परिसरात दुर्दैवी घटना; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

0
कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून २० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे...

अकृषिक रूपांतरण प्रक्रिया आता ऑनलाइन; बीपीएमएस प्रणाली सुरू

0
मुंबई : राज्यातील जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रूपांतरण प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इमारत परवानगी...

मॉर्फ केलेले फोटो ऑनलाईन टाकणाऱ्या हिंजवडीतील एका व्यक्तीला पाच लाखांची मागणी करून अटक

0
पुणे : रावेत पोलिसांनी रविवारी हिंजवडी येथील एका प्लेसमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्याला एका ओळखीच्या मंगेतराचे आणि आईचे मॉर्फ केलेले फोटो अनेक अश्लील वेबसाइटवर पोस्ट केल्याप्रकरणी...

रोखीने त्रस्त असलेल्या पुणे कॅन्टने 120 वर्षे जुन्या एमजी रोड इमारतीचे व्यावसायिक रूपांतर करण्याची...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (PCB) एमजी रोडवरील ऐतिहासिक मुख्यालय पुन्हा व्यावसायिक उपक्रमात बदलून सध्याचे आर्थिक संकट दूर करण्याचा विचार करत आहे.120 वर्षांहून अधिक काळाचा...

लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई; ई-केवायसी न केलेल्या १४ लाख महिलांचा लाभ धोक्यात

0
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व लाभार्थ्यांची निकषांनुसार तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ई-केवायसी प्रक्रिया...

पळसदरी धरण परिसरात दुर्दैवी घटना; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

0
कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून २० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे...

अकृषिक रूपांतरण प्रक्रिया आता ऑनलाइन; बीपीएमएस प्रणाली सुरू

0
मुंबई : राज्यातील जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रूपांतरण प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इमारत परवानगी...
error: Content is protected !!