Homeताज्या बातम्याअंबरनाथ-बदलापुरात थकीत मालमत्ता करासाठी 'अभय योजना', आत्ताच कर भरा आणि अर्धा दंड...

अंबरनाथ-बदलापुरात थकीत मालमत्ता करासाठी ‘अभय योजना’, आत्ताच कर भरा आणि अर्धा दंड वाचवा

बदलापूर:-कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. यात मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्या थकबाकीवरील शास्तीमध्ये ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. गेल्या आठवड्यात कुळगाव बदलापूर नगर परिषदेने ही घोषणा केली होती. तर अंबरनाथ नगर परिषदेने मंगळवारी याबाबतची घोषणाकेली. नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी आणिथकबाकीसाठी या योजनेचालाभ घ्यावा असे आवाहनप्रशासनाच्या वतीने करण्यातआले आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेत मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात अभय योजना लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता, तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार नागरिकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी केले आहे.

तर मंगळवारी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी अभय योजनेची घोषणा केली. त्यानुसार अंबरनाथ शहरातील थकबाकी धारकांनी थकबाकीसह मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यात शास्ती ५० टक्के सुट दिली जाणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजश्री करंजुले यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

या अभय योजनेमुळे नागरिकांवरील थकबाकीचा भार कमी होईल आणि नगर परिषदेच्या तिजोरीतही महुसली भर पडेल अशी आशा नगर परिषद प्रशासनाला आहे. अंबरनाथ शहरात सुमारे ३८१ कोटींची शास्ती मालमत्ता धारकांवर आहे. तर या नव्या अभय योजनेमुळे मालमत्ता धारकांचे सुमारे १९० कोटी रूपये वाचणार आहेत, अशीही माहिती नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिली आहे. तर ज्या मालमत्ता धारकांची १९ मे २०२५ पर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरही अभय योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही करंजुले यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेत मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात अभय योजना लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार नागरिकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी केले आहे.

तर मंगळवारी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी अभय योजनेची घोषणा केली. त्यानुसार अंबरनाथ शहरातील थकबाकी धारकांनी थकबाकीसह मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यात शास्ती ५० टक्के सुट दिली जाणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजश्री करंजुले यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या अभय योजनेमुळे नागरिकांवरील थकबाकीचा भार कमी होईल आणि नगर परिषदेच्या तिजोरीतही महुसली भर पडेल अशी आशा नगर परिषद प्रशासनाला आहे. अंबरनाथ शहरात सुमारे ३८१ कोटींची शास्ती मालमत्ता धारकांवर आहे. तर या नव्या अभय योजनेमुळे मालमत्ता धारकांचे सुमारे १९० कोटी रूपये वाचणार आहेत, अशीही माहिती नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिली आहे. तर ज्या मालमत्ता धारकांची १९ मे २०२५ पर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरही अभय योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही करंजुले यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

४५ दिवसांच्या एलपीजी रिफिल कॅपमुळे ग्रामीण कुटुंबांमध्ये नाराजी पसरली, गावकऱ्यांमध्ये टंचाईची भीती

0
पुणे: शहरी ग्राहक 25 दिवसांनंतर रिफिल बुक करू शकत असले तरी घरगुती द्रवरूप पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडरचे बुकिंग केवळ 45 दिवसांनंतर करण्याची परवानगी देण्याच्या...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील एलपीजी एजन्सीबाहेर नागरिकांच्या तासनतास रांगा लागल्याने कामाचे दिवस वाया गेले

0
पुणे: एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याने लोकांना पुन्हा भरण्याच्या आशेने गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहावे लागत असल्याने शहरभरातील रहिवाशांमध्ये निराशा वाढत आहे....

बारामतीच्या हॉटेल व्यावसायिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुरवठा पूर्ण निलंबनाऐवजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या रेशनिंगसाठी...

0
पुणे: पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या प्रवेशावरील निर्बंध असताना, बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती केली की हा पुरवठा...

पुण्यातील व्यावसायिक स्वयंपाकघरे इंधन पर्याय शोधतात, अनेक पॉज ऑप्स

0
पुणे: एलपीजीच्या सध्याच्या टंचाईमुळे शहरातील अनेक रेस्टॉरंट्सचे कामकाजाचे तास कमी करणे, मेनूमध्ये कपात करणे, स्वयंपाकाच्या तात्पुरत्या पद्धतींचा प्रयोग करणे आणि स्वयंपाकघरेही बंद करणे या...

एलपीजीचा तुटवडा असूनही पारंपारिक स्वयंपाकामुळे पुण्यात रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू राहतात

0
पुणे: शहरातील अनेक रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल तुलनेने कमी व्यत्ययांसह सुरू आहेत, एलपीजी टंचाईमुळे रेस्टॉरंट्स आणि घरांमधील कामकाजात व्यत्यय येत असूनही, सणासुदीच्या खाद्यपदार्थांच्या तयारीचा भाग...

४५ दिवसांच्या एलपीजी रिफिल कॅपमुळे ग्रामीण कुटुंबांमध्ये नाराजी पसरली, गावकऱ्यांमध्ये टंचाईची भीती

0
पुणे: शहरी ग्राहक 25 दिवसांनंतर रिफिल बुक करू शकत असले तरी घरगुती द्रवरूप पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडरचे बुकिंग केवळ 45 दिवसांनंतर करण्याची परवानगी देण्याच्या...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील एलपीजी एजन्सीबाहेर नागरिकांच्या तासनतास रांगा लागल्याने कामाचे दिवस वाया गेले

0
पुणे: एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याने लोकांना पुन्हा भरण्याच्या आशेने गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहावे लागत असल्याने शहरभरातील रहिवाशांमध्ये निराशा वाढत आहे....

बारामतीच्या हॉटेल व्यावसायिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुरवठा पूर्ण निलंबनाऐवजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या रेशनिंगसाठी...

0
पुणे: पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या प्रवेशावरील निर्बंध असताना, बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती केली की हा पुरवठा...

पुण्यातील व्यावसायिक स्वयंपाकघरे इंधन पर्याय शोधतात, अनेक पॉज ऑप्स

0
पुणे: एलपीजीच्या सध्याच्या टंचाईमुळे शहरातील अनेक रेस्टॉरंट्सचे कामकाजाचे तास कमी करणे, मेनूमध्ये कपात करणे, स्वयंपाकाच्या तात्पुरत्या पद्धतींचा प्रयोग करणे आणि स्वयंपाकघरेही बंद करणे या...

एलपीजीचा तुटवडा असूनही पारंपारिक स्वयंपाकामुळे पुण्यात रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू राहतात

0
पुणे: शहरातील अनेक रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल तुलनेने कमी व्यत्ययांसह सुरू आहेत, एलपीजी टंचाईमुळे रेस्टॉरंट्स आणि घरांमधील कामकाजात व्यत्यय येत असूनही, सणासुदीच्या खाद्यपदार्थांच्या तयारीचा भाग...
error: Content is protected !!