अंबरनाथ :- निवडणूक म्हटली की घरोघरी प्रचार, कार्यअहवाल, जाहीरनामा, फलकबाजी आणि प्रचार सभा होताना आपल्याला दिसतात.जमिनीवरच्या या पारंपरिक प्रचारासोबत आता समाज माध्यमांवरील प्रचारात आघाडी घेणेही तितकेच महत्वाचे ठरू लागले आहे.अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीतही प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवर ठोस प्रचार दिसत नसला तरी समाज माध्यमांवर प्रमुख उमेदवारांमध्ये तुंबळ युद्ध दिसते आहे.आपली सकारात्मक बाजू सांगत असताना विरोधकाची विरोधी बाजू सांगण्यात या प्रचाराची दिशा बदलली आहे.यातून खालच्या स्तरावर चिखलफेक केली जात असून मतदारांचे मात्र मनोरंजन होते आहे.
गेल्या काही वर्षात पारंपरिक प्रचाराच्या माध्यमातून निवडणुका लढण्यासोबतच नव्या डिजीटल रूपातही प्रचाराला प्राधान्य दिले जाते.ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगर परिषदा असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दहा वर्षांनंतर पारंपरिक प्रचारासोबत आधुनिक प्रचारही जोरदार रंगला.बदलापूर परिषदेची पाच जागा वगळता मतदान प्रक्रिया संपन्न झाली.मात्र अंबरनाथ नगरपरिषदेची मतदान प्रक्रिया पूर्णपणे पुढे ढकलली गेली होती.ती आता २० डिसेंबर रोजी होणार आहे.
गेल्या काही वर्षात पारंपरिक प्रचाराच्या माध्यमातून निवडणुका लढण्यासोबतच नव्या डिजीटल रूपातही प्रचाराला प्राधान्य दिले जाते. ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगर परिषदा असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दहा वर्षांनंतर पारंपरिक प्रचारासोबत आधुनिक प्रचारही जोरदार रंगला. बदलापूर परिषदेची पाच जागा वगळता मतदान प्रक्रिया संपन्न झाली. मात्र अंबरनाथ नगरपरिषदेची मतदान प्रक्रिया पूर्णपणे पुढे ढकलली गेली होती. ती आता २० डिसेंबर रोजी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात एकमेकांवर थेट टीका करणारे उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात जरासे शांत झाल्याचे दिसून आले आहे.मात्र समाज माध्यमांवरचा प्रचार टोकाला पोहोचला आहे. फेसबुक,इन्स्टाग्राम,युट्युबसारख्या समाजमाध्यम मंचावर स्वतःची चांगली बाजू दाखवत असताना विरोधकाची नकारात्मक बाजूही तितक्याच खालच्या स्तरावरून सांगितली जाते आहे.
कुळगाव बदलापूर नगरपरिषद निवणुकीत भाजपकडून शिवसेनेच्या (शिंदे) वामन म्हात्रे यांच्यावर समाज माध्यमावर टीका करण्यात आली होती.तर भाजपच्या आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यावरही अशाच प्रकारे समाज माध्यमातून टीका केली जात होती.तसाच प्रकार अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीतही होतोना दिसतो आहे.






















