बदलापूर:गेल्या काही वर्षात बदलापूर शहर हा झपाट्याने विकसित झाला आहे.त्याबरोबरच बदलापूर शहरातील लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बदलापूर मधील नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबई येथे नोकरीसाठी जातात हेच लक्षात घेऊन बदलापूर शहर परिसर मुंबई, कांजुरमार्ग,कल्याण परिसरातून मेट्रो मार्गाने जोडण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.तसेच हे प्रकल्प गतीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक हे सहकार्य करण्याची मागणी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राम पातकर यांच्या मूलभूत सुविधाअंतर्गत असलेल्या या पत्राची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नगर विकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांना पत्र लिहून ठाणे भिवंडी कल्याण शहराकडे येणारी मेट्रो 5 बदलापूर शहराकडे विस्तारित करण्यासाठी आवश्यक कार्यवाई करावी. तसेच मुंबईतून कांजूरमार्ग ऐरोली शीळ फाटा काटई ते बदलापूर प्रस्तावित मेट्रो 14 या मालिकेचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना मेट्रो 14 या मार्गीकेचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कल्याण ते बदलापूर आणि कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग संदर्भात आवश्यक त्या कार्यवाही करून स्वयं स्पष्ट अहवाल नगर विकास विभागाचे अवर सचिव जयसिंग पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून मागवला आहे.
मागील दोन ते तीन वर्षापासून बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष राम पाटकर हे कल्याणचा मेट्रो मार्ग बदलापूर पर्यंत विस्तारित करण्यासाठी आणि प्रस्तावित कांजूरमार्ग ते काटइ बदलापूर मेट्रो 14 मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत.























