सोलापूर: सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणत्याही व्यक्तीला अटक करताना पोलिसांना संबंधित व्यक्तीला लेखी स्वरूपात द्यावी लागणार आहेत. हे कलम 22 (1) नुसार व्यक्ती स्वतंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. लेखित स्वरूपात कारणे न दिल्यास अटक आणि कोठडी बेकायदेशीर ठरू शकते.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
अटकेतील आरोपीला २४ तासांत न्यायालयात हजर करावे लागते. त्यावेळी अटकेची कारणे आरोपीला समजावून सांगावी लागतात. त्याच्यावरीत अपराध जामीनपात्र असल्पाचेही त्याला सांगणे आवश्यक आहे. आरोपीला अटकेची कारणे दोन तासांत देणे पोलिसांना बंधनकारक आहे, अन्यथा ती अटक किवा रिमांड बेकायदा ठरेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आरोपीच्या अटकेची आवश्यकता का आहे, अटक केल्पाबद्दल त्याच्या नातेवाईक किंवा जवळच्या
मित्राला सांगितले आहे का, हेही पोलिसांना न्यायालयात सविस्तर सांगावे लागते.
-प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर
अटकेची माहिती देऊनच आरोपीला केली जाते अटक
एखाद्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यानंतर दोन तासांत त्याच्या रिमांड किवा अटकेची कारणे न्यायालयास कळवावी लागतात. दुसरीकडे, आरोपीच्या अटकेबाबत त्याच्या नातेवाइकास माहिती दिली जाते. सात वर्षपिक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची कारणे न्यायालयास देऊनच अटक करावी लागते. ज्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची गरज आहे, अशा गुन्ह्यात आरोपीला अटक होते.
– विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोतापूर शहर























