बदलापूर: सतत चालू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पावसामध्ये वाढलेली गढूळता आणि विजपुरवठा अचानक बंद होणे यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमतेवर परिणाम झाल्याने बदलापूर शहरामध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा कपात करण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वी पाऊस कमी झाल्यामुळे नदीतील गढूळता कमी झाल्याने पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमता वाढली आहे. हे लक्षात घेऊन पाणी कपात मागे घेण्यासाठी जीवन प्राधिकरणाने हालचाली सुरु केल्या आहेत.
बदलापूरकरांच्या स्वप्नात पण नसेल कि यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून पाणी सुरु होईल. दरवर्षी जून महिन्याचे काही दिवस गेल्यानंतर पाऊस सुरु होतो परंतु यंदा असे झाले नाही पाऊसाने मे महिन्यातच हजेरी लावली. त्यासोबतच बदलापूर शहराच्या वेशीवरच जावारलाल नेहरू न्यास ते बडोदे द्रुतगती महामार्गचे काम जोराने चालू होते. या कामासाठी मोठ्या प्रमाणात नाती लागणार होती त्याच मातीची पूर्तता करण्यासाठी बदलापूर शहराच्या अवती भवती असलेल्या छोट्या – मोठ्या डोंगरायची माती खोदण्यात आली पावसामुळे यातील काही माती वाहून नदीच्या पत्रात आली आणि नंतर जलवाहिन्यांमध्ये शिरली होती. त्याचवेळी बदलापूर शहरातील कुचकामी महावितरण व्यवस्तेमुळे शहरामध्ये सातत्याने विजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे उचल यात्रनेला फटका बसत होता.परिणामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमता कमी झाली होती. त्याचा फटका पाणी वितरण यंत्रणेला बसत होता. अनेकदा पाणी उचल १२० दशलक्ष लीटरपेक्षा कमी होत असल्याने शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा किंवा अपुरा पुरवठा होत होता. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस एका भागात पाणी कपात करून चक्राकार पद्धतीने पाणी कपात केल्यास पाण्याचे समप्रमाणात वितरण करता येणे शक्य होते. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी कपात लागू केली होती.
परंतु शहरात अश्या एक दिवस चक्रकार पद्धतीने पाणी कपात करणाऱ्या पद्धतीमुळे नागरिकांना आठवड्यातून तीन ते चार दिवस परिणाम दिसून येत होता. त्यामुळे नागरिक संतापाळे होते. नागरिकांना आठवडाभर पाणी टंचाई सहन करायला लागत होती. त्यामुले नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता.सोमवारी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली श्रीधर पाटील, संजय गायकवाड आणि इतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयात धडक दिली. पाणी कपात बंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर बोलताना उपविभागीय अधिकारी सुरेश खाद्री यांनी लवकरच याबाबतचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सव तसेच दिवाळीपूर्वी पाणी कपातीतून मुक्तता मिळणार आहे.
पाण्याची गढूळताही कमी होत आहे. महावितरणाच्या वीज पुरवठ्याबाबतचा प्रश्न ही मिटत चालला आहे त्यामुळे पाण्याची क्षमता १२० दशलक्ष लिटरवरून १३० लिटरवर पोहचली आहे. असेच राहिले तर पाणी कपटीपासून नागरिकांना सुटकारा मिळेल.























