Homeताज्या बातम्याभारतातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा

भारतातील पहिले ‘जेन झी टपाल’ आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा

मुंबई: पोस्ट ऑफिस म्हटलं की पारंपरिक काउंटर, लांबच लांब रांगा आणि कागदी व्यवहारांचा अनुभव अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र या प्रतिमेला पूर्णविराम देत इंडिया पोस्टने आधुनिकतेकडे मोठं पाऊल टाकलं आहे. आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये मुंबईतील पहिले ‘जेन-झी पोस्ट ऑफिस’ (Gen-Z Post Office) सुरू करण्यात आले आहे.

कालच उद्घाटन झालेलं हे जेन-झी पोस्ट ऑफिस इंडिया पोस्टच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याआधी दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशात यशस्वी ठरलेल्या या संकल्पनेनंतर आता मुंबईत, विशेषतः आयआयटीसारख्या ज्ञानकेंद्रात हा उपक्रम सुरू होणं हे प्रतीकात्मकदृष्ट्याही महत्त्वाचं मानलं जात आहे.

या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह, मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक कैया अरोरा, आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार, इंडिया पोस्टचे अधिकारी-कर्मचारी तसेच आयआयटी मुंबई समुदायाचे सदस्य उपस्थित होते.

तंत्रज्ञान हा या जेन-झी पोस्ट ऑफिसचा कणा आहे. येथे पूर्णतः QR-आधारित डिजिटल सेवा, मोफत वाय-फाय, आधार नोंदणी व अद्ययावत सुविधा, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (POSB) योजनांबाबत मार्गदर्शन, तसेच पार्सल व लॉजिस्टिक्स सेवांची माहिती देणारे ‘पार्सल ज्ञान पोस्ट’ अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तरुणांची आवड लक्षात घेऊन येथे कॅफेटेरिया-स्टाईल बसण्याची व्यवस्था, मिनी लायब्ररी, स्वतंत्र म्युझिक कॉर्नर तसेच फिलॅटेलीमध्ये रस असणाऱ्यांसाठी निवडक साहित्यही उपलब्ध आहे. त्यामुळे हे पोस्ट ऑफिस केवळ सेवा केंद्र न राहता, एक अनुभवकेंद्र ठरत आहे.

विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या असून, स्पीड पोस्ट सेवांवर १० टक्के सूट, तर बल्क पार्सल ग्राहकांसाठी ५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

जेन-झी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून इंडिया पोस्ट तरुण पिढीशी नव्या पद्धतीने संवाद साधत असून, डिजिटल युगातही पोस्ट ऑफिसची उपयुक्तता अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक

0
पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

PCMC ने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली, 40 दिवसांत 300 हून अधिक बेकायदा बांधकामे...

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती दिली आहे, काही दिवसांतच पालिका अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेसाठी कारवाई करून पावसाळ्यापूर्वी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या...

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले.

0
पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

पुणे पोलिसांनी 5 वर्षात 130 बांगलादेशींना हद्दपार केले

0
पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

पवार कुटुंबीय पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या

0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक

0
पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

PCMC ने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली, 40 दिवसांत 300 हून अधिक बेकायदा बांधकामे...

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती दिली आहे, काही दिवसांतच पालिका अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेसाठी कारवाई करून पावसाळ्यापूर्वी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या...

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले.

0
पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

पुणे पोलिसांनी 5 वर्षात 130 बांगलादेशींना हद्दपार केले

0
पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

पवार कुटुंबीय पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या

0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...
error: Content is protected !!