मुंबई:महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा संघ ५२ धावांनी पराभव करत विश्वचषक आपल्या नावे केला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात गडी बाद २९८ धावा केल्या.प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर गारद झाला. दीप्ती शर्माने पाच विकेट घेत सामना भारतीय संघाच्या बाजूने फिरवला.दक्षिण आफ्रिकेची कर्णधार एल वोल्वार्डची १०१ धावांची खेळी व्यर्थ गेली. महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या ५२ वर्षांच्या इतिहासात भारताचे हे पहिलेच एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद आहे.पहिला महिला एकदिवसीय विश्वचषक १९७३ मध्ये खेळवण्यात आला.
भारताने ५० षटकांत सात गडी गमावून २९८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला २९९ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांनी अर्धशतके केली.
भारताकडून दीप्ती शर्माने ५८ धावा आणि शफालीने ८७ धावा केल्या.स्मृती मानधनानेही ४५ धावा केल्या. रिचा घोषनेही २४ चेंडूत ३४ धावांची धमाकेदार खेळी केली.जेमिमा रॉड्रिग्ज २४ धावांवर आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २० धावांवर बाद झाल्या.अमनजोत कौरने १२ धावा केल्या.दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन बळी घेतले,तर म्लाबा,डी क्लार्क आणि क्लोई ट्रायॉनने प्रत्येकी एक बळी घेतला.























