बदलापूर(प्रतीक टोपले):गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे बदलापूर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. मागील महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकाचे अगोदरच मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर थोडी उघड मिळाल्यामुळे पीक काढणीला वेग आला होता. मात्र आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी सांगतात “भात कापून शेतात सुकण्यासाठी ठेवला असताना पाऊस पडल्यामुळे पूर्ण भातशेतीचा नुकसान झाला”. तर काही ठिकाणी गर्वा बियांना लावल्यामुले अजून कापणीला सुरुवात झाली नाही. परतीच्या पावसामुळे ते पीक कुजायला सुरुवात झाली तर काही पीक कुजून त्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला. बदलापूर सह अंबरनाथ,कल्याण मुरबाड व शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा परतीच्या पावसामुळे मोठा नुकसान झाला आहे.























