Homeबदलापूरआधी पूल उभारा, मगच मार्ग बंद करा; अंबरनाथच्या रेल्वे रूळांशेजारील भिंत बांधकामाला...

आधी पूल उभारा, मगच मार्ग बंद करा; अंबरनाथच्या रेल्वे रूळांशेजारील भिंत बांधकामाला पादचाऱ्यांचा विरोध

अंबरनाथ: अंबरनाथ कडून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांच्या शेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू केला होता. स्थानिक नागरिकांना कळताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला
सध्या अंबरनाथ येथे पूर्वेतून पश्चिम दिशेला जाण्यासाठी कोणताही पूल किंवा पादचारी पूल नाही. त्यामुले रेल्वे प्रशासनाने भिंत उभारल्यावर पश्चिम भागातील नागरिकांना पूर्वेकडे जायला मोठा फेरा मारावा लागणार आहे.त्याचा परिणाम मोरिवली गावातून शेजारच्या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, घरकामगार महिला यांना सहन आहे. त्यामुळे आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच भिंत बांधा, अशी ठाम मागणी महिलांनी केली असून त्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाला तात्पुरते माघार घ्यावी लागली.

अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरीवली पाडा आणि बि कॅबिन परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागात आता हजारो कुटुंबे वास्तव्यास असून, त्याठिकाणी घरकाम तसेच विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पश्चिमेकडून दररोज हजारो महिला घरकामासाठी या भागात येतात, तर आनंदनगर एमआयडीसीत नोकरी करणारे शेकडो पुरुष, महिला रेल्वे रुळ ओलांडूनच पूर्वेकडील भाग गाठतात. सध्या खुल्या असलेल्या या मार्गामुळे पादचाऱ्यांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचतो. मात्र रेल्वेच्या विकास योजनेतर्गत बांधली जाणारी सुरक्षा भिंत उभारल्यास हा मार्ग कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागेल.

तब्बल ५ किलोमीटरचा फेरा

अंबरनाथ पश्चिमेतील मोरिवली येथील औद्योगिक वसाहत आणि पूर्वेतील निसर्ग ग्रीन हे गृहसंकुल हा प्रवास या रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत होतो. मात्र रस्ते मार्गाने या प्रवासासाठी २५ ते ३० मिनिटे लागतात. तर हे अंतर तब्बल पाच किलोमीटर इतके आहे. कारण हा मार्ग ओलांडण्यासाठी वाहनाने एकतर हुतात्मा चौकाजवळी उड्डाणपूल किंवा फॉरेस्ट नाक्याजवळील उड्डाणपुलावरून जावे लागेल. वाहन नसल्यास त्यासाठी रिक्षाचा अवलंब करावा लागेल आणि दिवसाला साधारण ८० रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे

संतापलेल्या महिलांसमोर रेल्वे प्रशासनाने घेतली माघार

बुधवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने बी कॅबिन मार्गावर सुरक्षा भिंतीचे काम सुरू केले होते. मात्र घरकामासाठी निघालेल्या महिलांना यामुळे मोठा त्रास झाला. तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींसह शेकडो महिलांनी एकत्र येऊन कामाला विरोध दर्शवला. आम्ही हातावर पोट भरणारे आहोत. महिन्याला हजारो रुपयांचा प्रवास खर्च आमच्यासाठी परवडणारा नाही. हा मार्ग बंद झाल्यास आमच्या रोजगारावरच गदा येईल. रेल्वेने आधी पादचारी पूल बांधावा, त्यानंतरच भिंत उभारावी, अशी महिलांची ठाम भूमिका होती. शेवटी महिलांच्या संतापामुळे रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना माघार घ्यावी लागली.

उड्डाणपूलाचा प्रस्ताव अजूनही रखडलेला

कल्याण-बदलापूर मार्गावरील मोरीवली नाका ते पूर्वेकडील बि कॅबिन निसर्ग ग्रीन या ठिकाणी उड्डाणपूलाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा पूल झाल्यास केवळ वाहन चालकांचाच नव्हे तर पादचाऱ्यांचाही मोठा फेरा आणि खर्च वाचणार आहे. मात्र लाल फितीत अडकलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अजूनही रोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल PCMC ने 9 RMC प्लांट सील केले

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी भागातील नऊ रेडी-मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट सील केले...

जुन्नरमध्ये ताज्या बिबट्याच्या हल्ल्यात 27 वर्षीय तरुण जखमी

0
पुणे : जुन्नरच्या वडगाव आनंद गावात शनिवारी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्याने पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरील जंगलाच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे....

कोरड्या वायव्येकडील वाऱ्यांमुळे पुणे जिल्ह्य़ात तापमान एकांकिकेपर्यंत पोहोचते

0
पुणे: किमान तापमानात सातत्याने घसरण सुरूच राहिल्याने, रविवारी ग्रामीण पुण्यातील काही भागांमध्ये एक अंकी घसरण झाल्याने, हंगामातील सर्वात थंड सकाळ ठरली.हवेली हे ठिकाण सर्वात...

MVA च्या ‘अधिक अनुकूल’ सल्ल्या असूनही काँग्रेस BMC मध्ये एकट्याने जाणार आहे

0
पुणे: काँग्रेसने शनिवारी जाहीर केले की ते बृहन्मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, परंतु बिहारमध्ये पक्षाला नुकताच झालेला धक्का लक्षात घेऊन...

पिंपरखेड गावात बिबट्यासोबत झालेल्या चकमकीत महिला हादरली

0
पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड गावात शेतात काम करणाऱ्या महिलेला शुक्रवारी दुपारी काही अंतरावर असलेल्या झाडावरून अचानक बिबट्याने उडी मारल्याने तिला धक्काच बसला. घाबरलेली...

पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल PCMC ने 9 RMC प्लांट सील केले

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी भागातील नऊ रेडी-मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट सील केले...

जुन्नरमध्ये ताज्या बिबट्याच्या हल्ल्यात 27 वर्षीय तरुण जखमी

0
पुणे : जुन्नरच्या वडगाव आनंद गावात शनिवारी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्याने पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरील जंगलाच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे....

कोरड्या वायव्येकडील वाऱ्यांमुळे पुणे जिल्ह्य़ात तापमान एकांकिकेपर्यंत पोहोचते

0
पुणे: किमान तापमानात सातत्याने घसरण सुरूच राहिल्याने, रविवारी ग्रामीण पुण्यातील काही भागांमध्ये एक अंकी घसरण झाल्याने, हंगामातील सर्वात थंड सकाळ ठरली.हवेली हे ठिकाण सर्वात...

MVA च्या ‘अधिक अनुकूल’ सल्ल्या असूनही काँग्रेस BMC मध्ये एकट्याने जाणार आहे

0
पुणे: काँग्रेसने शनिवारी जाहीर केले की ते बृहन्मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, परंतु बिहारमध्ये पक्षाला नुकताच झालेला धक्का लक्षात घेऊन...

पिंपरखेड गावात बिबट्यासोबत झालेल्या चकमकीत महिला हादरली

0
पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड गावात शेतात काम करणाऱ्या महिलेला शुक्रवारी दुपारी काही अंतरावर असलेल्या झाडावरून अचानक बिबट्याने उडी मारल्याने तिला धक्काच बसला. घाबरलेली...
error: Content is protected !!