Homeआरोग्यअंबरनाथ आणि बदलापूरला प्रदूषणाचा वेढा : पाणी आणि हवेमुळे आरोग्य...

अंबरनाथ आणि बदलापूरला प्रदूषणाचा वेढा : पाणी आणि हवेमुळे आरोग्य धोक्यात

अंबरनाथ:- शहराला पाणी पुरवठा करणारे चिखलोली धरण आणि नव्या विस्तारलेल्या निवासी भागांमध्ये दूषित पाणी आणि आणि वायू प्रदूषणामुळे अंबरनाथकरांच्या आरोग्यावर गंभीर संकट उभ राहिलेलं आहे.
विशेषतः पावसाळ्यात विविध रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहामध्ये आणि हवेमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिळून दूषित केलं जात आहे. धोकादायक पातळीपर्यंत पोचलेल हे प्रदूषण नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) वारंवार तक्रारी होऊनही केवळ कागदपत्री कारवाई करत आहेत असे आरोप आहेत.तर बाजूच्या बदलापूर शहरातही औद्योगिक वसाहतीमधील सोडला जाणारा औद्योगिक वायु पावसाळ्याच्या काळात अधिक त्रासदायक ठरताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू झालेला हा प्रदूषणाचा प्रश्न कधी संपणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

गेल्या काही वर्षात झपाटीने विस्तारणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराला गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाने वेढा घातला आहे. नैसर्गिक वाहणाऱ्या नाल्यांमध्ये प्रक्रिया न केलेलं दूषित पाणी तर कधी हवेमध्ये रासायनिक वायू सोडणे असे या कंपन्यांचा नित्यक्रम आहे. अनेक वर्ष या शहरांतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद होते. काहींमध्ये योग्यरित्या प्रक्रिया केल्या जात नसल्याचा आरोप देखील होत होता. परंतु इतक्या वर्षानंतरही या समस्येवर मार्ग मिळाला नाही. म्हणून आजही प्रदूषण कमी होण्याच्या ऐवजी वाढत चालला आहे.

शेकडो रासायनिक कंपन्या आणि त्यांच्यामुळे नागरिकांना होणारा त्रास

अंबरनाथ मध्ये आनंदनगर, मोरिवली, आणि वडवली या ३ तर बदलापूर मध्ये खरवई अश्या हया परिसरामध्ये ४ एमआयडीसी आहेत. या परिसरामध्ये शेकडो रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच चिखलोली धरणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल होत. ज्यामुळे चिखलोली धरणातील पाणी दूषित होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला.
दुसरीकडे मोरीवली, वडोली, आणि बदलापूर मधील खरवई भागातील कंपन्या पावसाच्या आडून मोठ्या प्रमाणात रासायनिक धूर सोडून वायू दूषित करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना दूषित वायूतून आणि रासायनिक पाण्यातून आरोग्याला धोका पोचत आहे.

रसायनामुळे रहाव लागत घरातच कोंडून

अंबरनाथ मधून मोरीवली पाडा, ग्रान सिटी, बी कॅबिन तसेच बदलापूर पूर्वेकडील विविध भागातील रहिवाशांना रासायनिक वायूच्या प्रदूषणामुळे दारे—खिडक्या बंद ठेऊन घरातच कोंडून रहाव लागत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला जीवघेणा संकट

मोरिवली औद्योगिक वसाहतीच्या शेजारी ३ नामांकित शाळा आहेत व तिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ह्या शाळा कंपन्यांच्या अगदी हाकेच्या अंतरावर असल्याकारणाने, प्रदूषणाचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे

प्रशासन कधी जागे होणार?

बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये पाणी आणि वायू प्रदूषणाचा प्रश्न वर्षानुवर्षे गंभीर होत चालला आहे. आता तो नागरिकांच्या आरोग्यावर पोहचला आहे तरीही कंपन्या प्रदूषण करीत राहतात आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ फक्त कागदपत्री नोंदणी करून आपली जबाबदारी संपवते, असा आरोप होत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी जयंत कदम यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

0
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

0
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...
error: Content is protected !!