Homeताज्या बातम्याफडणवीस सरकारचा बदल्यांचा धडाका कायम; राज्यातील 'या' आठ आयएएस अधिकाऱ्यांची झाली बदली

फडणवीस सरकारचा बदल्यांचा धडाका कायम; राज्यातील ‘या’ आठ आयएएस अधिकाऱ्यांची झाली बदली

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. राज्य गेल्या काही महिन्यात आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या केल्या आहेत. मागील महिन्यात राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आज (10 जून) पुन्हा एकदा 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयएएस आप्पासाहेब धुळाज यांची मंत्रालयात ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयएएस आप्पासाहेब धुळाज हे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघात व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होते. मात्र आता त्यांची मंत्रालयातील ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आयएएस बाबासाहेब बेलदार हे छत्रपती संभाजी नगर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त होते. मात्र आता त्यांची महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. नितीन पाटील (IAS:SCS:2007) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. लहू माळी (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:२०१५) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. मानसी (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

0
पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

0
पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...
error: Content is protected !!