मुंबई:महाराष्ट्रामध्ये यंदाच्या वर्षी LLB ३ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विक्रमी प्रवेश झाले आहेत. आत्तापर्यंत २२५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. इतर वर्षांपेक्षा यंदा प्रवेश संख्येत वाढ झाली आहे. २२५३२ प्रवेशामुळे अभ्यासक्रमच्या ९५% जागा भरल्या गेल्या आहेत.
अनेक क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरीदार पुढच्या शिक्षणासाठी या अभ्यासक्रमाला निवडत आहेत. ३ वर्षांच्या पदवीमुळे नोकरीत मिळू शकणारी बढती, तसेच वकिली व्यवसायाला असलेली प्रतिष्ठा अनेकांना या अभ्यास क्रमात प्रवेश करण्यासाठी आकृष्ट करत आहे. ३ वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी या वर्षी २१७ कॉलेज मध्ये २३७२९ जागा होत्या. या जगांसाठी तब्बल ५३९९० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील फक्त २२, ५३२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे असे दिसून येते. या प्रवेशामुळे सर्व कॉलेज मधील जागा हाऊसफुल झाल्या आहेत.
जागा वाढवून सुद्धा प्रवेशासाठी करावी लागते स्पर्धा
गेल्या ५ वर्षात ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या जगांमध्ये ५३०४ एवढी मोठी भर झाली आहे. तसेच गेल्या वर्षी जेवढ्या जागा होत्या त्याच्यामध्ये एकूण २६५८ जागांची वाढ करण्यात आली आहे. तरीसुद्धा प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने यंदासुद्धा खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळाली.
गेल्या वर्षी ३ वर्ष अभ्यासक्रमासाठी २१०७१ जागा होत्या.
या वर्षी ३ वर्ष अभ्यासक्रमासाठी २३७२९ जागा होत्या. तर गेल्या वर्षीप्रमाणे २६५८ जागांची वाढी झालेली आहे. तसेच गेल्या ५ वर्षात ५३०४ एवढी वाढ झाली आहे.
LLB ५ वर्षांसाठी १००२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश.
५ वर्ष अभ्यासक्रमासाठी १३५८९जागा होत्या त्यापैकी १००२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजून ३५६३ जागा रिक्त आहेत. तर गेल्या वर्ष्याच्या तुलनेत यंदाच्या वर्षी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पाच वर्षी अभ्यासक्रमासाठी १२७३१ जागा होत्या, त्यापैकी ९४३८ जागा भरल्या होत्या.






















