Homeउद्योगअंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना मिळणार नव्या मेट्रो सेवेचा लाभ!

अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना मिळणार नव्या मेट्रो सेवेचा लाभ!

बदलापूर:- मुंबईतील लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अंबरनाथ बदलापूर या परिसरातूनही मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त दररोज मुंबईला ये-जा करतात. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि रेटारेटीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना नव्या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. मेट्रो १४ प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असून ही मेट्रो चिखलोली रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरून जिएनपी मॉलपर्यंत जाणार आहे.मेट्रो ५ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांच्या विस्तारित टप्यांमुळे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि लोकल गाड्यांवरील ताण कमी होईल.पीपीपी म्हणजेच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.तसेच,मेट्रो ५ ही ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गे दुर्गाडी नाक्यापासून बिर्ला महाविद्यालय मार्गे होणार आहे.यामुळे या भागातील रहिवाशांना थेट आणि जलद मेट्रो सेवा मिळणार असून, चिखलोली हे एक प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. सोबतच चिखलोली रेल्वे स्थानकात रेल्वे आणि मेट्रो सेवांचे एकत्रीकरण होणार असून, येथील स्थानक आधुनिक आणि सुसज्ज पद्धतीने उभारले जाणार आहे. यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएला दिल्या आहेत.सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. या मेट्रो 14 मार्गाचे काम एमएमआरडीए करणार आहे.एमएमआरडीएच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. या बैठकीला अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही या प्रकल्पासाठी मागणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

0
पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी पुण्याचा माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66 लाख रुपये...

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीचा कर्मचारी (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक मंचाला बळी पडला आणि...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ नोटीस

0
टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

0
पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी पुण्याचा माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66 लाख रुपये...

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीचा कर्मचारी (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक मंचाला बळी पडला आणि...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ नोटीस

0
टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...
error: Content is protected !!