Homeताज्या बातम्याबारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बदलापूर : बारवी धरण परिसरात संततधार पाऊस होत असून धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. शनिवारी (दि.२६) सकाळी धरणातील पाणीपातळी ही ७०.९२ मीटर झाली आहे. बारवी धरणाची उंची ही ७२.६० मीटर आहे. पावसाचा जोर पाहता धरण लवकरच भरण्याची शक्यता असून धरणावरील स्वयंचलित दरवाजे उघडले जातील. यामुळे चारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात उतरण्यास पर्यटकांना बंदीची सूचना तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर कराव्यात, असे पत्रदेखील एमआयडीसीने तहसीलदारांना पाठविले आहे.
एमआयडीसीच्या बारवी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण, तसेच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी धरणातील पाणीपातळी ही ७०.९२ मीटर एवढी असून बारवी धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. बारवी धरणाची उंची ७२.६० मी असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात येणारा पाण्याचा स्रोत वाढला आहे. त्यामुळे बारवी धरणाची पातळी वाढून बारवी धरणाचे स्वयंचलित वक्रद्वारे (गेट) येणाऱ्या काही दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. परिणामस्वरूप बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. त्यामुळे चारवी नदीकाठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली , सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा. चोण. रहाटोली व नदीकाठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असलेबाबत सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती आहे. तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांना व पर्यटकांना प्रवेश न देणेबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करणेबाबत सूचना आपले स्तरावरुन देण्यात याव्यात,अशा सूचना देण्याची विनंती एमआयडीसीने केली आहे.
विसर्ग काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिक व पर्यटकांना प्रवेश देऊ नये, तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्याबाबत सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, अशी विनंती अंबरनाथ एमआयडीसी बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईक यांनी कल्याण अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड तहसीलदारांना पत्र पाठवून केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्याविहार पादचारी पुलासाठी मध्य रेल्वेचा तीन रात्री विशेष ब्लॉक; लोकल फेऱ्यांवर परिणाम

0
मुंबई : विद्याविहार स्थानकाच्या मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या गर्डर स्थापनेसाठी मध्य रेल्वेकडून सलग तीन रात्री विशेष मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. आज, शुक्रवार...

पीसीएमसीच्या महापौरांनी अझरबैजान दौरा रद्द केला, पंतप्रधानांच्या काटेकोरतेच्या आवाहनानंतर इंधन भत्ता वाढ कमी केला

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) सार्वजनिक टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय काटकसरीचे आवाहन केल्यानंतर नागरी खर्चात लक्षणीय वाढ करणारे दोन प्रमुख प्रस्ताव...

‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात; आधुनिक इनडोअर स्टेडियमची आमदार कथोरे यांची घोषणा

0
बदलापूर : क्रीडामय वातावरणात बुधवारी (ता. १३) शहर पूर्णपणे न्हाऊन निघाले. निमित्त होते ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या भव्य उद्घाटनाचे. हेंद्रेपाडा येथील...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

पुणे बारमध्ये आरपीआय (आठवले) नेत्याची भोसकून हत्या

0
RPI (A) नेते अनिल मारुती मोरे" decoding="async" fetchpriority="high"/>आरपीआय (ए) नेते अनिल मारुती मोरे पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कामगार आघाडीचे...

विद्याविहार पादचारी पुलासाठी मध्य रेल्वेचा तीन रात्री विशेष ब्लॉक; लोकल फेऱ्यांवर परिणाम

0
मुंबई : विद्याविहार स्थानकाच्या मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या गर्डर स्थापनेसाठी मध्य रेल्वेकडून सलग तीन रात्री विशेष मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. आज, शुक्रवार...

पीसीएमसीच्या महापौरांनी अझरबैजान दौरा रद्द केला, पंतप्रधानांच्या काटेकोरतेच्या आवाहनानंतर इंधन भत्ता वाढ कमी केला

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) सार्वजनिक टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय काटकसरीचे आवाहन केल्यानंतर नागरी खर्चात लक्षणीय वाढ करणारे दोन प्रमुख प्रस्ताव...

‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात; आधुनिक इनडोअर स्टेडियमची आमदार कथोरे यांची घोषणा

0
बदलापूर : क्रीडामय वातावरणात बुधवारी (ता. १३) शहर पूर्णपणे न्हाऊन निघाले. निमित्त होते ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या भव्य उद्घाटनाचे. हेंद्रेपाडा येथील...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

पुणे बारमध्ये आरपीआय (आठवले) नेत्याची भोसकून हत्या

0
RPI (A) नेते अनिल मारुती मोरे" decoding="async" fetchpriority="high"/>आरपीआय (ए) नेते अनिल मारुती मोरे पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कामगार आघाडीचे...
error: Content is protected !!