Homeबदलापूरआधी पूल उभारा, मगच मार्ग बंद करा; अंबरनाथच्या रेल्वे रूळांशेजारील भिंत बांधकामाला...

आधी पूल उभारा, मगच मार्ग बंद करा; अंबरनाथच्या रेल्वे रूळांशेजारील भिंत बांधकामाला पादचाऱ्यांचा विरोध

अंबरनाथ: अंबरनाथ कडून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांच्या शेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू केला होता. स्थानिक नागरिकांना कळताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला
सध्या अंबरनाथ येथे पूर्वेतून पश्चिम दिशेला जाण्यासाठी कोणताही पूल किंवा पादचारी पूल नाही. त्यामुले रेल्वे प्रशासनाने भिंत उभारल्यावर पश्चिम भागातील नागरिकांना पूर्वेकडे जायला मोठा फेरा मारावा लागणार आहे.त्याचा परिणाम मोरिवली गावातून शेजारच्या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, घरकामगार महिला यांना सहन आहे. त्यामुळे आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच भिंत बांधा, अशी ठाम मागणी महिलांनी केली असून त्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाला तात्पुरते माघार घ्यावी लागली.

अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरीवली पाडा आणि बि कॅबिन परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागात आता हजारो कुटुंबे वास्तव्यास असून, त्याठिकाणी घरकाम तसेच विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पश्चिमेकडून दररोज हजारो महिला घरकामासाठी या भागात येतात, तर आनंदनगर एमआयडीसीत नोकरी करणारे शेकडो पुरुष, महिला रेल्वे रुळ ओलांडूनच पूर्वेकडील भाग गाठतात. सध्या खुल्या असलेल्या या मार्गामुळे पादचाऱ्यांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचतो. मात्र रेल्वेच्या विकास योजनेतर्गत बांधली जाणारी सुरक्षा भिंत उभारल्यास हा मार्ग कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागेल.

तब्बल ५ किलोमीटरचा फेरा

अंबरनाथ पश्चिमेतील मोरिवली येथील औद्योगिक वसाहत आणि पूर्वेतील निसर्ग ग्रीन हे गृहसंकुल हा प्रवास या रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत होतो. मात्र रस्ते मार्गाने या प्रवासासाठी २५ ते ३० मिनिटे लागतात. तर हे अंतर तब्बल पाच किलोमीटर इतके आहे. कारण हा मार्ग ओलांडण्यासाठी वाहनाने एकतर हुतात्मा चौकाजवळी उड्डाणपूल किंवा फॉरेस्ट नाक्याजवळील उड्डाणपुलावरून जावे लागेल. वाहन नसल्यास त्यासाठी रिक्षाचा अवलंब करावा लागेल आणि दिवसाला साधारण ८० रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे

संतापलेल्या महिलांसमोर रेल्वे प्रशासनाने घेतली माघार

बुधवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने बी कॅबिन मार्गावर सुरक्षा भिंतीचे काम सुरू केले होते. मात्र घरकामासाठी निघालेल्या महिलांना यामुळे मोठा त्रास झाला. तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींसह शेकडो महिलांनी एकत्र येऊन कामाला विरोध दर्शवला. आम्ही हातावर पोट भरणारे आहोत. महिन्याला हजारो रुपयांचा प्रवास खर्च आमच्यासाठी परवडणारा नाही. हा मार्ग बंद झाल्यास आमच्या रोजगारावरच गदा येईल. रेल्वेने आधी पादचारी पूल बांधावा, त्यानंतरच भिंत उभारावी, अशी महिलांची ठाम भूमिका होती. शेवटी महिलांच्या संतापामुळे रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना माघार घ्यावी लागली.

उड्डाणपूलाचा प्रस्ताव अजूनही रखडलेला

कल्याण-बदलापूर मार्गावरील मोरीवली नाका ते पूर्वेकडील बि कॅबिन निसर्ग ग्रीन या ठिकाणी उड्डाणपूलाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा पूल झाल्यास केवळ वाहन चालकांचाच नव्हे तर पादचाऱ्यांचाही मोठा फेरा आणि खर्च वाचणार आहे. मात्र लाल फितीत अडकलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अजूनही रोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे लव्ह जिहादचे प्रकरण होते’: पुण्यातील सायली सुर्वेचा आंतरधर्मीय विवाहानंतर छळ झाल्याचा आरोप, हिंदू...

0
पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील एका मॉडेलने हिंदू धर्म स्वीकारला असून, मुस्लिम व्यावसायिकासोबत लग्न करताना तिला छळाचा सामना करावा लागल्याचा दावा केला...

प्रकरण सोडवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुण्यातील उपनिरीक्षकावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे

0
एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल पुणे - राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी एका ४० वर्षीय व्यक्तीकडून १ लाख रुपयांची...

संपूर्ण महाराष्ट्रात एचएससी आणि एसएससी परीक्षांमध्ये कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षक, शाळा कर्मचाऱ्यांना बोर्डाने...

0
पुणे: सध्या सुरू असलेल्या एचएससी आणि एसएससी परीक्षांमध्ये परीक्षेतील गैरप्रकारांची तब्बल 81 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे राज्यभरातील केंद्रांवर सामूहिक कॉपी आणि...

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी MIDC 10 दिवसांत आर्थिक कर्ज देणार आहे

0
पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, एजन्सी प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी उभारण्यासाठी येत्या 10 दिवसांत वित्तीय संस्था निश्चित...

मुंढवा जमीन व्यवहार: अमाडियाने कागदपत्रांसाठी वेळ मागितल्यानंतर IGR पुढील सुनावणी 16 मार्च रोजी ठेवणार...

0
पुणे: नोंदणी महानिरीक्षक (IGR) यांनी सोमवारी अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीच्या 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्कातील तुटवडा आणि दंडाच्या मागणीविरोधातील अपीलाची पुढील सुनावणी 16...

‘हे लव्ह जिहादचे प्रकरण होते’: पुण्यातील सायली सुर्वेचा आंतरधर्मीय विवाहानंतर छळ झाल्याचा आरोप, हिंदू...

0
पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील एका मॉडेलने हिंदू धर्म स्वीकारला असून, मुस्लिम व्यावसायिकासोबत लग्न करताना तिला छळाचा सामना करावा लागल्याचा दावा केला...

प्रकरण सोडवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुण्यातील उपनिरीक्षकावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे

0
एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल पुणे - राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी एका ४० वर्षीय व्यक्तीकडून १ लाख रुपयांची...

संपूर्ण महाराष्ट्रात एचएससी आणि एसएससी परीक्षांमध्ये कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षक, शाळा कर्मचाऱ्यांना बोर्डाने...

0
पुणे: सध्या सुरू असलेल्या एचएससी आणि एसएससी परीक्षांमध्ये परीक्षेतील गैरप्रकारांची तब्बल 81 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे राज्यभरातील केंद्रांवर सामूहिक कॉपी आणि...

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी MIDC 10 दिवसांत आर्थिक कर्ज देणार आहे

0
पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, एजन्सी प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी उभारण्यासाठी येत्या 10 दिवसांत वित्तीय संस्था निश्चित...

मुंढवा जमीन व्यवहार: अमाडियाने कागदपत्रांसाठी वेळ मागितल्यानंतर IGR पुढील सुनावणी 16 मार्च रोजी ठेवणार...

0
पुणे: नोंदणी महानिरीक्षक (IGR) यांनी सोमवारी अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीच्या 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्कातील तुटवडा आणि दंडाच्या मागणीविरोधातील अपीलाची पुढील सुनावणी 16...
error: Content is protected !!