Homeताज्या बातम्याउल्हास नदी पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

उल्हास नदी पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई – जेथे अनेक वर्षे पूर आलेला नाही त्याठिकाणी जलसंपदा विभागाने पूर रेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात आढावा घेताना उल्हास नदीकिनारी नकाशातील पूर रेषा आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत माहिती घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हास नदी पूर नियंत्रण रेषेबाबत मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावी असे निर्देश दिले आहेत.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. स्थानिक आमदार किसन कथोरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.गोविंदराज, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात अनेक नद्यांच्या किनारी अनेक वर्षांमध्ये पूर आलेला नाही. तथापि पूर नियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येत आहेत. सर्व नदीकिनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करुन पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या सोबतच कुळगाव बदलापूर हद्दीतील बेलवली कात्रप रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिजबाबत एमएमआरडीएने तर दत्त चौक ते समर्थनगर पर्यंतच्या रेल्वे लाईनला समांतर ओव्हर ब्रिज बांधण्याच्या कामाबाबत नगर परिषदेने तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. या कामाबरोबरच बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सॅटिस प्रकल्पाच्या कामास गती द्यावी. गॅरेज रोड ते होपलाईन पॉवर हाऊस बदलापूर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास गती द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. कांजूरमार्ग- ऐरोली- शिळफाटा- कटाई- बदलापूर मेट्रो या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा आढावा घेऊन सुरू असलेली प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

काळू धरणाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. बदलापूर शहरात स्वतंत्र वीज उपकेंद्र असणे आवश्यक असल्याने प्रस्तावित टाटा पॉवर कंपनीच्या उपकेंद्रास लागणाऱ्या जागेला एमएमआरडीएने तातडीने मान्यता द्यावी, असे सांगून कुळगाव पोलीस स्टेशनसाठी एमआयडीसीच्या जागेबाबत तातडीने प्रस्ताव सादर करून गृह विभागाने त्यास मंजूरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कुळगाव मधील खाजगी मिळकतीवरील शाळेच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरक्षणात बदल करून ती शाळा नगरपरिषदेने चालवण्यास घ्यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याव्यतिरिक्त कुळगाव बदलापूर परिसरात सुरू असलेल्या विविध स्थानिक प्रकल्पांचा मुख्यमंत्री यांनी आढावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेला चार वर्षांनी महापौरपद मिळाले: भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाहेर...

0
भाजप नगरसेविका मंजुषा नागपुरे पुणे : पुणे महापालिकेला तब्बल चार वर्षानंतर सोमवारी महापौर आणि उपमहापौरपद मिळाले असून, दोन्ही पदे बिनविरोध भरण्यात आली...

IMDR च्या ५१ व्या दीक्षांत समारंभात डॉ. तपन सिंघेल म्हणाले, समस्या सोडवण्याची क्षमता हीच...

0
पुणे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाने जागतिक कार्यस्थळाचा आकार बदलत असताना, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील पारंपरिक एंट्री-लेव्हल नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. तथापि,...

पीएमसीचा पे-अँड-पार्क उपक्रम जाहीर होऊन दोन महिने उलटूनही अद्याप कागदावरच आहे

0
पुणे : महापालिकेची पे-अँड-पार्क योजना जाहीर होऊन सुमारे दोन महिने उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहरातील सहा प्रमुख रस्त्यांवर ही सुविधा सुरू...

FTII च्या अत्याधुनिक थिएटरला पेटंट मिळाले

0
पुणे: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ला सिनेमाचे प्रोजेक्शन आणि स्टेज परफॉर्मन्स एकाच जागेत आणणाऱ्या नवीन डिझाइन केलेल्या ऑडिटोरियम सिस्टमचे पहिले पेटंट...

वारंवार अपघात आणि युनेस्को टॅग करूनही महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यांवर सुरक्षेतील त्रुटी कायम आहेत.

0
पुणे: मधमाशांचे हल्ले, ट्रेकर्सचे खोल दरीत घसरणे आणि जीवघेणे धबधबे यासह वर्षानुवर्षे अपघातांची मालिका होऊनही, महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांवर मूलभूत सुरक्षा उपाय अत्यंत अपुरे आहेत....

पुणे महापालिकेला चार वर्षांनी महापौरपद मिळाले: भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाहेर...

0
भाजप नगरसेविका मंजुषा नागपुरे पुणे : पुणे महापालिकेला तब्बल चार वर्षानंतर सोमवारी महापौर आणि उपमहापौरपद मिळाले असून, दोन्ही पदे बिनविरोध भरण्यात आली...

IMDR च्या ५१ व्या दीक्षांत समारंभात डॉ. तपन सिंघेल म्हणाले, समस्या सोडवण्याची क्षमता हीच...

0
पुणे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाने जागतिक कार्यस्थळाचा आकार बदलत असताना, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील पारंपरिक एंट्री-लेव्हल नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. तथापि,...

पीएमसीचा पे-अँड-पार्क उपक्रम जाहीर होऊन दोन महिने उलटूनही अद्याप कागदावरच आहे

0
पुणे : महापालिकेची पे-अँड-पार्क योजना जाहीर होऊन सुमारे दोन महिने उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहरातील सहा प्रमुख रस्त्यांवर ही सुविधा सुरू...

FTII च्या अत्याधुनिक थिएटरला पेटंट मिळाले

0
पुणे: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ला सिनेमाचे प्रोजेक्शन आणि स्टेज परफॉर्मन्स एकाच जागेत आणणाऱ्या नवीन डिझाइन केलेल्या ऑडिटोरियम सिस्टमचे पहिले पेटंट...

वारंवार अपघात आणि युनेस्को टॅग करूनही महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यांवर सुरक्षेतील त्रुटी कायम आहेत.

0
पुणे: मधमाशांचे हल्ले, ट्रेकर्सचे खोल दरीत घसरणे आणि जीवघेणे धबधबे यासह वर्षानुवर्षे अपघातांची मालिका होऊनही, महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांवर मूलभूत सुरक्षा उपाय अत्यंत अपुरे आहेत....
error: Content is protected !!