Homeताज्या बातम्याबदलापूरमध्ये वाढली थंडीची चाहूल; तापमान १५ अंशांवर

बदलापूरमध्ये वाढली थंडीची चाहूल; तापमान १५ अंशांवर

बदलापूर : दिवाळीची ऊब ओसरताच बदलापूर शहरात थंडीने जोरदार उपस्थिती लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचे तापमान लक्षणीयरीत्या घटले असून, सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास ते १५ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

पहाटेच्या वेळचा गारठा वाढत असून शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, सकाळी फिरायला जाणारे नागरिक यांना या थंडीचा तीव्र अनुभव येत आहे. अनेक घरांतून स्वेटर, चादरी आणि घोंगड्या पुन्हा बाहेर काढल्या जात आहेत. पहाटे हवेत जाणवणारा धुरकटपणा आणि दवबिंदू त्यामुळे थंडी अधिक स्पष्ट जाणवत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कोकण पट्ट्यात पोहोचत असल्याने तापमानात घट झाली आहे. पुढील आठवडाभर हे थंड वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आठवड्यानंतर दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम म्हणून तापमानात काही प्रमाणात वाढ आणि आर्द्रतेत बदल जाणवू शकतो.

आरोग्य तज्ज्ञांचा इशारा
थंडीची सुरुवात असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा व सर्दी-खोकल्याची समस्या असलेल्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार (मरणोत्तर) देण्याच्या नव्या याचिकेवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना मागवा: हायकोर्टाने...

0
कोल्हापूर : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते दिवंगत खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार (मरणोत्तर) बहाल करण्याबाबत नवीन प्रक्रिया सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या...

36 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका करण्याचे आदेश राज्याने दोषीच्या अधिकारांचे ‘उल्लंघन’ केल्याबद्दल हायकोर्टाने व्यक्त केला...

0
कोल्हापूर: 36 वर्षांच्या तुरुंगवासानंतर, रोनाल्ड अल्वारेस (65) या बलात्कार आणि खुनाचा दोषी, अखेर 3 मे रोजी कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडला कारण राज्याने...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

0
पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

0
पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

एमओएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच असायला हवे होते, असे जय पवार म्हणाले

0
पुणे: खासदार मुरलीधर मोहोळ यांची या पदासाठी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोमवारी सांगितले की,...

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार (मरणोत्तर) देण्याच्या नव्या याचिकेवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना मागवा: हायकोर्टाने...

0
कोल्हापूर : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते दिवंगत खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार (मरणोत्तर) बहाल करण्याबाबत नवीन प्रक्रिया सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या...

36 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका करण्याचे आदेश राज्याने दोषीच्या अधिकारांचे ‘उल्लंघन’ केल्याबद्दल हायकोर्टाने व्यक्त केला...

0
कोल्हापूर: 36 वर्षांच्या तुरुंगवासानंतर, रोनाल्ड अल्वारेस (65) या बलात्कार आणि खुनाचा दोषी, अखेर 3 मे रोजी कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडला कारण राज्याने...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

0
पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

0
पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

एमओएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच असायला हवे होते, असे जय पवार म्हणाले

0
पुणे: खासदार मुरलीधर मोहोळ यांची या पदासाठी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोमवारी सांगितले की,...
error: Content is protected !!