दर्शन सोनवणे
अंबरनाथ : महावितरण प्रशासनाच्या २० व्या वर्धापण दिनीच्या दिवशीचं अंबरनाथमध्ये काँगेसने निषेध आंदोलन केले. महावितरण प्रशासनाने टीओडी आणि स्मार्ट / प्रीपेड मीटर ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसवू नये. या मागणीसाठी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कडुन हे निषेध आंदोलन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.६) रोजी सकाळी पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेजवळील चौकातून पश्चिमेच्या महावितरण कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो हातात घेऊन घोषणाबाजी केली तसेच केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. टीओडी आणि स्मार्ट / प्रिपेड मीटरमुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात येऊन ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही, त्यामुळे मीटर बदलण्याची सक्ती महावितरण प्रशासनाने नागरिकांवर करु नये, तसेच ग्राहकांच्या संमतीने मीटर बसवण्यात यावेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती महावितरणला करता येणार नाही. असे महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहर ब्लॉक अध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव अनिता प्रजापती, माजी नगरसेवक विलास जोशी, अंबरनाथ शहर काँग्रेस प्रशासन व संघटन सरचिटणीस रोहितकुमार प्रजापती, सरचिटणीस नंदू देवडे, सायरा सय्यद, गोपाल राय, राजेंद्र मिश्रा, शंकर गायकवाड, अजिंक्य सावंत, अब्दुलगणी पिरजादे, पुष्पा पनीकर, राईस शेख, अण्णा भालेराव, शोभा बांगर,दीपक भोईर, बानो सय्यद, दिलारा खान, सलीम खान, जगदीश तेलंगे, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्तिथ होते.























