बदलापूर :- बदलापुरमधील शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर सीबीएसई बोर्डाने आपल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे सक्तीचे केले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे दृक्-श्राव्य रेकॉर्डिंगची क्षमता असलेले उच्च दर्जाचे असतील. अशी सूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व शाळांना दिले आहेत.विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने सर्व शाळांच्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी ऑडिओ-व्हिज्युअल रेकॉर्डिंगसह उच्च-रेझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने सर्व शाळांच्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी ऑडिओ-व्हिज्युअल रेकॉर्डिंगसह उच्च-रेझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत जारी करण्यात आलेल्या नव्या निर्देशानुसार, संलग्न शाळांनी वर्गखोल्या, कॉरिडॉर, ग्रंथालये, जिने आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी शौचालय आणि वॉशरूम वगळून ऑडिओ-व्हिज्युअल रेकॉर्डिगसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे. याशिवाय, किमान १५ दिवसांचा फुटेज बॅकअप उपलब्ध ठेवणे आवश्यक असून, आवश्यकतेनुसार तो संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावा लागेल.या संदर्भात सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, अफिलिएशन बाय लॉज-२०१८ मध्ये सुधारणा केली असून, ती शाळांच्या संलग्नतेचे नियम ठरवते. बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक आरोग्याचे रक्षण करणे शाळेची जबाबदारी असते. त्याअनुषगांने सीबीएसई बोर्डाचे सचिव हिमांशु गुप्ता यांनी नवी नियमावली जारी केली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुरक्षा नियमानुसार शाळांमध्ये सीसीटीव्हीची नियमित देखभाल अत्यावश्यक आहे. सीबीएसईचा निर्णय सर्व शाळांनी काटेकोर पाळावा लागणार आहे.























