Homeताज्या बातम्यासिग्नल यंत्रणा नियमित करण्यापूर्वी अरुंद रस्त्यांचा विचार होणे गरजेचं....

सिग्नल यंत्रणा नियमित करण्यापूर्वी अरुंद रस्त्यांचा विचार होणे गरजेचं….

बदलापूर : शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर सिग्नल येताना उभारण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी ठीक ठिकाणी आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुख्यतः शहरातील पश्चिम भागातील रस्ते हे अरुंद आहेत एकावेळी केवळ दोन वाहने जाऊ शकतात अशावेळी जर वाहनांना डावीकडे वळण घ्यायचे असेल तर मात्र त्यांना सिग्नल असूनही वळण घेता येत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे शहरातील अरुंद रस्ते.

शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा रेल्वे उड्डाणपूल आणि बेलवली येथील भुयारी मार्ग या दोन मार्गावर दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शाळा सुटण्याची वेळ असल्याने स्कूल बसेस मोठ्या प्रमाणात या भागातून ये जा करीत असतात अशावेळी रस्त्यावर केवळ दोन वाहने एका वेळी जाऊ शकतात. अशा स्थितीमध्ये डावीकडे सिग्नल चालू असतानाही वाहन चालकाला डावीकडे जाता येत नाही.
कल्याण बदलापूर रोड ज्या पद्धतीने अंबरनाथ शहरांमध्ये रुंद करण्यात आला आहे तोच रस्ता बदलापूर शहरात आल्यानंतर मात्र अरुंद होतो. अरुंद रस्त्यामुळे सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता सिग्नल यंत्रणा उभारण्यात आले आहे की वाहतूक समस्या अधिक गडद व्हावी याकरिता उभारण्यात आली आहे असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालकांना पडत आहे.
बेलवली येथून गणेश चौककडे जाताना असलेला सिग्नल हा डावीकडे जाण्याकरिता सुरू असतो परंतु रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनांमुळे डावीकडे जाणाऱ्या वाहनांना जाणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ज्या भागात यापूर्वी वाहतूक कोंडी होत नव्हते त्या भागात देखील आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शहरातील विविध भागात उभारलेली सिग्नल यंत्रणा सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे अशावेळी अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडी याचा विचार होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून उभारण्यात आलेली यंत्रणा अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोथरूड कायदा व सुव्यवस्थेबाबत मोहोळ आणि पाटील यांनी पुण्यातील उच्चपदस्थ पोलिसांची भेट घेतली, गुन्हेगारी...

0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, "आपण किंवा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड...

बीएसआयला 2038 पर्यंत भाडेतत्त्वावर जमीन, परंतु वतनदार सरकारकडून हक्क पुनर्संचयित करण्याची मागणी करतात.

0
पुणे: मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मूळ महार वतनदार कुटुंबांनी 2038 पर्यंत ही जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ला भाडेपट्ट्याने...

इच्छूक उमेदवारांच्या कपिल पाटील यांच्याकडून मुलाखती.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीसाठी प्रयत्नशील!

0
बदलापूर:कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ८० हून अधिक इच्छूक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. दरम्यान, केंद्र,...

या वर्षी जवळपास 4,000 सीईटी टॉपर्सनी राष्ट्रीय संस्थांसाठी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालये नाकारली

0
पुणे: महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या परिदृश्याने यावर्षी आश्चर्यकारक वळण घेतले, जवळजवळ 4,000 उच्च गुण मिळविणाऱ्या सामाईक प्रवेश चाचणी (CET) विद्यार्थ्यांनी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वगळण्याचा...

PMC पुनर्विकासापूर्वी जुन्या मालमत्तांच्या सुरक्षित पाडावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते

0
पुणे : पुनर्विकास करावयाच्या मालमत्ता सुरक्षितपणे पाडण्याचे निर्देश पीएमसीने विकासकांना दिले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निर्देशांनुसार, विकासकांनी हे सुनिश्चित...

कोथरूड कायदा व सुव्यवस्थेबाबत मोहोळ आणि पाटील यांनी पुण्यातील उच्चपदस्थ पोलिसांची भेट घेतली, गुन्हेगारी...

0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, "आपण किंवा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड...

बीएसआयला 2038 पर्यंत भाडेतत्त्वावर जमीन, परंतु वतनदार सरकारकडून हक्क पुनर्संचयित करण्याची मागणी करतात.

0
पुणे: मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मूळ महार वतनदार कुटुंबांनी 2038 पर्यंत ही जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ला भाडेपट्ट्याने...

इच्छूक उमेदवारांच्या कपिल पाटील यांच्याकडून मुलाखती.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीसाठी प्रयत्नशील!

0
बदलापूर:कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ८० हून अधिक इच्छूक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. दरम्यान, केंद्र,...

या वर्षी जवळपास 4,000 सीईटी टॉपर्सनी राष्ट्रीय संस्थांसाठी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालये नाकारली

0
पुणे: महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या परिदृश्याने यावर्षी आश्चर्यकारक वळण घेतले, जवळजवळ 4,000 उच्च गुण मिळविणाऱ्या सामाईक प्रवेश चाचणी (CET) विद्यार्थ्यांनी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वगळण्याचा...

PMC पुनर्विकासापूर्वी जुन्या मालमत्तांच्या सुरक्षित पाडावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते

0
पुणे : पुनर्विकास करावयाच्या मालमत्ता सुरक्षितपणे पाडण्याचे निर्देश पीएमसीने विकासकांना दिले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निर्देशांनुसार, विकासकांनी हे सुनिश्चित...
error: Content is protected !!