शहर विकासाचे श्रेय घेणारे वाहतूक कोंडी समस्याची जबाबदारी घेणार का ? बदलापूरकरांचा प्रश्न
बदलापूर : बदलापूर शहरात सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे आणि यातूनच विविध पक्ष एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करीत आहेत. आपल्यामुळेच शहराचा विकास झाला असे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांना बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी समस्या जबाबदारी घेणार का असा सवाल वाहतूक कोंडी ने त्रस्त झालेला बदलापूरकर नागरिक ह्या राजकारण्यांना विचारत आहे.
शहरात वाहतूक समस्या सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये नेहमीच वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्यांच्या दिवशी तर बदलापूर शहरातील वाहतुकीबद्दल विचार न केलेला बरा अशी परिस्थिती शहरातील वाहतूक समस्येचे झालेली आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम भागा जोडणाऱ्या उड्डाणपुलाची शहरास नेत्यांत आवश्यकता आहे परंतु शहर विकासाच्या बाता मारणाऱ्या राजकारणाना अद्याप पर्यंत शहरात उड्डाणपूल उभारता आलेले नाही.
निवडणुकीच्या काळात केवळ उड्डाणपुलाचे फोटो किंवा टेंडर झाले असल्याच्या जाहिराती करून नागरिकांना भूलथापा देऊन मत मिळवण्याचा प्रकार राजकारण मार्फत होतो परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या आणि गाड्यांची संख्या ज्या पद्धतीने वाढली त्या पद्धतीने शहरांमध्ये रस्त्यांची रुंदी वाढली नाही अथवा रस्ते विकासाला कोणत्याही प्रकारची चालना मिळाली नाही.
स्टेशन जवळील एकमेव उड्डाणपूल हा नेहमीच ट्रॅफिकने गजबजलेला असतो अशावेळी बेलवली येथील भुयारी मार्ग त्यास थोडाफार आधार देत असतो. सद्यस्थितीत बेलवली भुयारी मार्गाचे रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने रस्ता बंद आहे अशावेळी एकमेव उड्डाणपूलवर
वाहतुकीचा भार आल्याने आज रविवारी उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडी मोठी समस्या निर्माण झाली. उड्डाणपूल ते दत्त चौक पर्यंत गाड्यांची रांगच रांग लागलेली दिसून आली.
शहरातील विकास कामांचा गाजावाजा करून जणू शहर विकास आपल्यामुळेच झाला असा भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांनो शहरातील वाहतूक समस्येला आपणच जबाबदार आहात याची जबाबदारी आपण घेणार का असा संतप्त प्रश्न यावेळी वाहतूक कोंडी मध्ये अडकलेला प्रत्येक वाहन चालक ह्या राजकारणांना करत आहे.























