पुणे- आज (दि.२६ जुलै २०२५ रोजी) दुपारी दत्ता फूड मॉल आणि नव्या टनेलच्या परिसरात, मुंबई‑पुणे एक्सप्रेसवेवर एका कंटेनर ट्रकच्या ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला. या अपघातात सुमारे १५ ते २० वाहने एका साखळी धडकेत सहभागी झाली.या अपघातात कुणी मरण पावलेले नाही, पण अनेक प्रवाशांना दुखापत झाली आहे. अत्यंत मोठी वाहतूक अडचण (ट्रॅफिक जॅम) निर्माण झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कंटेनर ट्रकच्या ब्रेक फेल होणे हा अपघाताचा मुख्य कारण ठरलं.मुंबई‑पुणे एक्सप्रेसवेवरील उतार, घाटाचा उतार, तीव्र वेग, ओव्हरटेकिंग या प्रकारचे अनेक अपघाताचे कारण होत असल्याचे वारंवार निदर्शनास येते.पावसाळी रस्त्यावर ओलसर परिस्थिती, धुका किंवा कमी दृश्यता यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता वाढते. हा द्रुतगती मार्ग भारतातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. ज्यावर दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात, तर शनिवार-रविवारी हा आकडा २ लाखांवर जातो. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती, परंतु या अपघातामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली. अपघातानंतर ४ ते ५ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.लोणावळा-खंडाळा घाटातून खाली उतरताना दत्ता फूडमॉलजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने प्रचंड वेगात इतर वाहनांना धडक दिली. यात १५ ते २० वाहने एकमेकांवर आदळली, तर तीन वाहनांचा पूर्णपणे चुराडा झाला. अनेक प्रवाशी जखमी झाल्याचे समजत आहे.अपघातानंतर जखमींना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. मात्र, अपघातग्रस्त वाहनांमुळे रस्ता अडवला गेल्याने ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अपघाताच्या ठिकाणी पोलिस आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. तरीही, रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.






















