Homeताज्या बातम्यामहावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात; ग्राहकांना भरावे लागणार ६० ते ७० टक्के...

महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात; ग्राहकांना भरावे लागणार ६० ते ७० टक्के अधिक विजेचे बिल !

महाराष्ट्र: राज्यभरात महावितरण कंपनीकडून पारंपरिक वीज मीटर काढून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, या नव्या तंत्रज्ञानामुळे घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ग्राहकांच्या तक्रारीनुसार, स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानंतर त्यांच्या वीज बिलात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त रक्कम भरण्याची वेळ ग्राहकांवर आली असून यामुळे असंतोष वाढत आहे. स्मार्ट मीटर हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित उपकरण असून, यामुळे वीज वापराची नोंद रिअल टाइममध्ये होते. हे मीटर दूरध्वनी प्रणालीद्वारे थेट महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असते आणि वीज वापर, बिले आणि थकबाकीची माहिती लगेच उपलब्ध होते. महावितरणने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, स्मार्ट मीटरमुळे वीज चोरी थांबेल, अचूक बिलिंग होईल आणि ग्राहकांना आपल्या वापराचे ट्रॅकिंग करता येईल. वाढलेल्या बिलांबाबत तपास सुरू असून, प्रत्येक तक्रारीवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही महावितरणने स्पष्ट केले.स्मार्ट मीटर हे आधुनिक आणि आवश्यक पाऊल असले तरी त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात पारदर्शकता आणि ग्राहकांची सहमती ही अत्यंत महत्त्वाची आहे. वाढलेल्या बिलामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शासन आणि महावितरणने यावर त्वरित स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे.राज्यात २ कोटी ८५ लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहक असून, ते सर्व महावितरण कंपनीला जोडले आहेत. या स्मार्ट मीटरची किंमत १२ हजार रुपये ठरविण्यात आली आहे. महावितरण कंपनी हे १२ हजार रुपये ग्राहकांकडूनच वीज बिलात अतिरिक्त रक्कम जोडून टप्याटप्प्याने वसूल करणार आहे. ही रक्कम ३४२ कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, ती वीज बिलाव्यतिरिक्त आहे.न्या स्मार्ट मीटरसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान जुन्या व नवीन मीटरच्या उणिवा व गती, त्यातून वाढणारे न वापरलेल्या विजेची बिले, चांगले मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. महावितरण कंपनीने या मीटरची सक्ती करू नये, ते ऐच्छिक असावे. वाटल्यास दोन्ही मीटर ताऊन कमी युनिट येईल, ते बिल ग्राहकांकडून घ्यावे, अशी प्रतिक्रिया किसान युनियनचे महादेवराव नखाते यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

४५ दिवसांच्या एलपीजी रिफिल कॅपमुळे ग्रामीण कुटुंबांमध्ये नाराजी पसरली, गावकऱ्यांमध्ये टंचाईची भीती

0
पुणे: शहरी ग्राहक 25 दिवसांनंतर रिफिल बुक करू शकत असले तरी घरगुती द्रवरूप पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडरचे बुकिंग केवळ 45 दिवसांनंतर करण्याची परवानगी देण्याच्या...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील एलपीजी एजन्सीबाहेर नागरिकांच्या तासनतास रांगा लागल्याने कामाचे दिवस वाया गेले

0
पुणे: एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याने लोकांना पुन्हा भरण्याच्या आशेने गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहावे लागत असल्याने शहरभरातील रहिवाशांमध्ये निराशा वाढत आहे....

बारामतीच्या हॉटेल व्यावसायिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुरवठा पूर्ण निलंबनाऐवजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या रेशनिंगसाठी...

0
पुणे: पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या प्रवेशावरील निर्बंध असताना, बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती केली की हा पुरवठा...

पुण्यातील व्यावसायिक स्वयंपाकघरे इंधन पर्याय शोधतात, अनेक पॉज ऑप्स

0
पुणे: एलपीजीच्या सध्याच्या टंचाईमुळे शहरातील अनेक रेस्टॉरंट्सचे कामकाजाचे तास कमी करणे, मेनूमध्ये कपात करणे, स्वयंपाकाच्या तात्पुरत्या पद्धतींचा प्रयोग करणे आणि स्वयंपाकघरेही बंद करणे या...

एलपीजीचा तुटवडा असूनही पारंपारिक स्वयंपाकामुळे पुण्यात रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू राहतात

0
पुणे: शहरातील अनेक रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल तुलनेने कमी व्यत्ययांसह सुरू आहेत, एलपीजी टंचाईमुळे रेस्टॉरंट्स आणि घरांमधील कामकाजात व्यत्यय येत असूनही, सणासुदीच्या खाद्यपदार्थांच्या तयारीचा भाग...

४५ दिवसांच्या एलपीजी रिफिल कॅपमुळे ग्रामीण कुटुंबांमध्ये नाराजी पसरली, गावकऱ्यांमध्ये टंचाईची भीती

0
पुणे: शहरी ग्राहक 25 दिवसांनंतर रिफिल बुक करू शकत असले तरी घरगुती द्रवरूप पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडरचे बुकिंग केवळ 45 दिवसांनंतर करण्याची परवानगी देण्याच्या...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील एलपीजी एजन्सीबाहेर नागरिकांच्या तासनतास रांगा लागल्याने कामाचे दिवस वाया गेले

0
पुणे: एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याने लोकांना पुन्हा भरण्याच्या आशेने गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहावे लागत असल्याने शहरभरातील रहिवाशांमध्ये निराशा वाढत आहे....

बारामतीच्या हॉटेल व्यावसायिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुरवठा पूर्ण निलंबनाऐवजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या रेशनिंगसाठी...

0
पुणे: पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या प्रवेशावरील निर्बंध असताना, बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती केली की हा पुरवठा...

पुण्यातील व्यावसायिक स्वयंपाकघरे इंधन पर्याय शोधतात, अनेक पॉज ऑप्स

0
पुणे: एलपीजीच्या सध्याच्या टंचाईमुळे शहरातील अनेक रेस्टॉरंट्सचे कामकाजाचे तास कमी करणे, मेनूमध्ये कपात करणे, स्वयंपाकाच्या तात्पुरत्या पद्धतींचा प्रयोग करणे आणि स्वयंपाकघरेही बंद करणे या...

एलपीजीचा तुटवडा असूनही पारंपारिक स्वयंपाकामुळे पुण्यात रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू राहतात

0
पुणे: शहरातील अनेक रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल तुलनेने कमी व्यत्ययांसह सुरू आहेत, एलपीजी टंचाईमुळे रेस्टॉरंट्स आणि घरांमधील कामकाजात व्यत्यय येत असूनही, सणासुदीच्या खाद्यपदार्थांच्या तयारीचा भाग...
error: Content is protected !!