Homeमहाराष्ट्रमहापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले

मुंबई:- गेली अडीच वर्षे निवडणूक रखडलेल्या मुंबई महापालिकेसह मुदत संपलेल्या सर्व म्हणजेच 27 आणि 2 नवीन अशा 29 महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

या महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या निवडणुका होणार आहेत. नवीन वर्षांत या निवडणुका होणार असून येणारे नवीन वर्ष कोणाला हसवणारे तर कोणाला निराश करणारे ठरणार आहे.

मुंबई महापालिकेने 13 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची 46 जणांची यादी जाहीर केल्यामुळे कधीही महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे रविवारी नागपुरात सूप वाजल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवार दि. 15 डिसेंबर पत्रकार परिषद घेत राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.

29 शहरांमधील महापालिका निवडणुका

सर्वोच्च न्यायालयाने याआधीच राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 च्या आधी निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहरांसह एकूण 29 महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. पण आता या निवडणुका होणार आहेत.

निवडणूक जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील 29 महापालिकांपैकी 27 महापालिकांची मुदत संपलेली आहे. पाच महापालिकांची मुदत 2020 मध्येच संपली होती. मुंबईसह 18 महापालिकांची 2022 मध्ये मुदत संपली होती. 4 महापालिकांची मुदत 2023 मध्ये संपली होती. जालना आणि इचलकरंजी या नवनिर्वाचित महापालिका आहेत. त्यांची सुद्धा मुदत संपलेल्या महापालिकांसोबतच निवडणूक होणार आहे, असे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.

मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी प्रत्येक मतदाराला केवळ 1 मत द्यावे लागेल. तर 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत. बहुतांश महापालिकेत एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. काही महापालिकेत एका प्रभागात 3 उमेदवार असतील तर काही प्रभागात 5 उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महापालिकांमध्ये मतदारांना साधारणपणे 3 ते 5 मते द्यावे लागतील, अशी महत्त्वाची माहिती देखील दिनेश वाघमारे यांनी दिली.

साडेतीन कोटी मतदार बजावणार हक्क

निवडणूक जाहीर झालेल्या सर्व 29 महापालिका क्षेत्रातील 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बदजावणार आहेत. त्यासाठी 39,147 मतदार पेंद्रे उभारण्यात येणार आहेत. तर मुंबईसाठी 10,111 मतदार पेंद्रे असतील. सर्व महापालिकांमध्ये ईव्हीएमद्वारेच मतदान होणार आहे.

नामनिर्देशन पत्र ऑफलाईनच

महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र ऑफलाईन घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढण़ाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जर कोणी अर्ज केला असेल तर त्याची सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा लागले. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. अन्यथा निवड रद्द होईल असेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार

निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मतदार यादी पेंद्रीय निवडणूक आयोगाने बनविलेली असते. त्यात राज्य निवडणूक आयोगाला कोणताही फेरफार करता येत नाही. तरीही राजकीय पक्षांनी काही आक्षेप घेतले होते. त्याबाबत खुलासा करताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, या निवडणुकीसाठी संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असे मार्क करण्यात आले आहे. या मतदारांच्या संदर्भात महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान पेंद्रावर मत देईल, हे लिहून घेण्यात आले आहे. दुबार मतदाराने लिहून दिलेल्या मतदान पेंद्राव्यतिरिक्त त्याला इतर कुठेही मतदान करू दिले जाणार नाही, असे दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. तसेच राजकीय पक्षांचे जे आक्षेप होते ते त्यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांना समजावून सांगून मिटवण्यात आले आहेत,असे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.

नवीन वर्षात उमेदवारीची लॉटरी

महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही 2 जानेवारी 2026 अशी असणार आहे. तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 ला होईल. या महापालिकांसाठी मतदान 15 जानेवारी होईल. तर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होईल, अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली. उमेदवारांची अंतिम यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होणार असल्याने अनेकांना उमेदवारीची लॉटरी लागणार आहे तर उमेदवारी न मिळणाऱ्यांची वर्षाच्या सुऊवातीलाच निराशा होणार आहे. त्यापेक्षाही निवडणुकीत जे उमेदवार विजयी होतील त्यांची नवीन वर्षांची सुऊवातच आनंददायी होणार आहे, तर जे पराभूत होतील त्यांची नवीन वर्षांची सुऊवात निराशाजनक होणार आहे.

निवडणूक होणाऱ्या महापालिका

मुंबई महानगर विभाग

1) मुंबई, 2) नवी मुंबई, 3) ठाणे, 4) कल्याण -डोंबिवली, 5) वसई -विरार, 6) भिवंडी, 7) मीरा -भाईंदर, 8) उल्हासनगर, 9) पनवेल.

पश्चिम महाराष्ट्र विभाग

1) पुणे, 2) पिंपरी -चिंचवड, 3) कोल्हापूर, 4) सांगली, 5) सोलापूर, 6) इचलकरंजी

उत्तर महाराष्ट्र विभाग

1) नाशिक, 2) अहिल्यानगर, 3) धुळे, 4) जळगाव, 5) मालेगाव

मराठवाडा विभाग

1) छत्रपती संभाजीनगर, 2) लातूर, 3) नांदेड -वाघाळा, 4) परभणी, 5) जालना

विदर्भ विभाग

1) नागपूर, 2) अकोला, 3) अमरावती, 4) चंद्रपूर

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज भरणे – 23 डिसेंबर

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – 30 डिसेंबर

उमेदवारी अर्जाची छाननी – 31 डिसेंबर

अर्ज मागे घेण्याचे मुदत – 2 जानेवारी

चिन्ह वाटप – 3 जानेवारी

मतदान – 15 जानेवारी

मतमोजणी – 16 जानेवारी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंढवा जमीन व्यवहार: सत्र न्यायालयाने मुद्रांक शुल्क माफी प्रकरणात पीओए-धारक तेजवानी आणि सब रजिस्ट्रार...

0
पुणे : मुंढवा येथील 40 एकर सरकारी जमिनीच्या विक्री कराराच्या नोंदणीवरील बेकायदेशीर मुद्रांक शुल्क माफी प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी (पीओए) धारक शीतल तेजवानी आणि...

महारेराने प्रक्रिया जलद करण्यासाठी एसओपी जारी केल्यानंतर दोन महिन्यांनंतरही घर खरेदीदार रिकव्हरी वॉरंटच्या अंमलबजावणीची...

0
पुणे: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) प्रक्रिया जलद करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मानक कार्यप्रणाली (एसओपी) सुरू करूनही वसुली वॉरंट अद्यापही अंमलबजावणीच्या टप्प्यावरच रखडल्याने, थकबाकीदार...

मराठा महोत्सवात “शिवशंभू शौर्यगाथा”

0
बदलापूर: सकल मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने यंदाही बदलापुरात मराठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या...

‘डबल स्टँडर्ड्स’: काँग्रेसने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा टिपू सुलतानची ‘स्तुती’ करणारा व्हिडिओ पोस्ट...

0
हर्षवर्धन सपकाळ (पीटीआय प्रतिमा) पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने सोमवारी...

23 विलीन झालेल्या क्षेत्रांसाठी राखीव निधी वळवण्याच्या PMC च्या हालचालीवर टीका होत आहे

0
पुणे : 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 5 कोटी रुपये नव्याने विलीन झालेल्या भागात ड्रेनेज पुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने...

मुंढवा जमीन व्यवहार: सत्र न्यायालयाने मुद्रांक शुल्क माफी प्रकरणात पीओए-धारक तेजवानी आणि सब रजिस्ट्रार...

0
पुणे : मुंढवा येथील 40 एकर सरकारी जमिनीच्या विक्री कराराच्या नोंदणीवरील बेकायदेशीर मुद्रांक शुल्क माफी प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी (पीओए) धारक शीतल तेजवानी आणि...

महारेराने प्रक्रिया जलद करण्यासाठी एसओपी जारी केल्यानंतर दोन महिन्यांनंतरही घर खरेदीदार रिकव्हरी वॉरंटच्या अंमलबजावणीची...

0
पुणे: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) प्रक्रिया जलद करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मानक कार्यप्रणाली (एसओपी) सुरू करूनही वसुली वॉरंट अद्यापही अंमलबजावणीच्या टप्प्यावरच रखडल्याने, थकबाकीदार...

मराठा महोत्सवात “शिवशंभू शौर्यगाथा”

0
बदलापूर: सकल मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने यंदाही बदलापुरात मराठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या...

‘डबल स्टँडर्ड्स’: काँग्रेसने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा टिपू सुलतानची ‘स्तुती’ करणारा व्हिडिओ पोस्ट...

0
हर्षवर्धन सपकाळ (पीटीआय प्रतिमा) पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने सोमवारी...

23 विलीन झालेल्या क्षेत्रांसाठी राखीव निधी वळवण्याच्या PMC च्या हालचालीवर टीका होत आहे

0
पुणे : 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 5 कोटी रुपये नव्याने विलीन झालेल्या भागात ड्रेनेज पुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने...
error: Content is protected !!