एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत नवीन 2399 उपचारांना मान्यता देण्यात आली आहे.
बैठकीत घेतलेले प्रमुख निर्णय
1.महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये 2399 पर्यंत वाढ करण्यास मान्यता.
2.आता 2399 उपचारांवर मिळणार वैद्यकिय उपचार.
3.प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करता येऊ शकतील अशा 25 उपचारांचा योजनेत समावेश.
4.सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे योजनेत समाविष्ट करण्यात येणार.
5.उपचारांच्या दर निश्चितीला मान्यतावैद्यकीय उपचारांची मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यास मान्यता.
6.रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुणवत्ता प्रमाणपत्र धारक.
7.रुग्णालयांना आणि आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अधिकची रक्कम देण्यात येणार.
8.योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, नगर विकास विभाग यांच्या रुग्णालयांच्या सहभाग वाढविण्यासाठी.
9.सूचना निर्गमित करण्यात येणार.
10.समग्र यादीतील राज्याचे 438 उपचार टीएमएस 2.0 प्रणालीशी सुसंगत करण्यात येणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी खाटांची मर्यादा कमी करून 20 खाटांचे रुग्णालय सामील करणे.
खाजगी रुग्णालयांना आमंत्रित करून नवे रुग्णालय सुरू करणे.
जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयाना त्यांची देयके वेळेत देणे.
पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी वेगळा कॉर्पस निधी उभारण्यासही त्यांनी सांगितले. या निधीतून हृदयप्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण आदी यासह 9 विविध उपचारांची शिफारस यावेळी मान्य करण्यात आली.
पीएमएस प्रणालीला मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय निधीशी जोडणे.
आदिवासी भागात निकष शिथिल करणे.
सर्वसामान्यांसाठी लाभ
अधिक उपचारांवर मोफत सुविधा.
अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार शक्य.
ग्रामीण भागात सोयीसुविधा वाढणार.
अँपमुळे माहिती मिळणे सोपे.























