Homeआरोग्यबदलापूरमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी सिग्नल यंत्रणा बंद; वाहनचालकांना दिलासा

बदलापूरमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी सिग्नल यंत्रणा बंद; वाहनचालकांना दिलासा

बदलापूर:- एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यभरासह बदलापूर शहरातही उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेत दुपारी १.३० ते ४.३० या वेळेत शहरातील सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिग्नलवर काही मिनिटे थांबावे लागल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि प्रवाशांना कडाक्याच्या उन्हात मोठा त्रास सहन करावा लागत होता. काँक्रीटच्या रस्त्यांमुळे उष्णता अधिक वाढून काही वाहनचालकांना चक्कर येण्याच्या घटनाही वाढल्या होत्या.

खासगी हवामान अभ्यासकांच्या मते, बदलापूर आणि परिसरात तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात असून कोकण पट्ट्यातील आर्द्रतेमुळे जाणवणारी उष्णता आणखी वाढत आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक असते.

यापूर्वी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख चौकांचे रुंदीकरण करून सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली होती. मात्र सध्याच्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सिग्नल यंत्रणेमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.

नगर परिषदेच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून विशेषतः कामानिमित्त बाहेर पडणारे कर्मचारी आणि रिक्षाचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, सिग्नल यंत्रणा बंद असताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आरोग्य विभागानेही नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उष्माघातापासून बचाव करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

0
पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

उल्हास नदी प्रदूषणावर ड्रोनची नजर; बदलापूरमध्ये कारवाईला वेग

0
बदलापूर:- उल्हास नदी सध्या वाढत्या प्रदूषणामुळे गंभीर संकटात सापडली असून, बदलापूर परिसरातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक बनली आहे. लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या या नदीच्या...

ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘मिशन भरारी’; ५९ जण इस्रो अभ्यास दौऱ्यावर, शासनाकडून ५० लाखांचा निधी

0
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन भरारी’ या उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या इस्रो...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

0
पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

उल्हास नदी प्रदूषणावर ड्रोनची नजर; बदलापूरमध्ये कारवाईला वेग

0
बदलापूर:- उल्हास नदी सध्या वाढत्या प्रदूषणामुळे गंभीर संकटात सापडली असून, बदलापूर परिसरातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक बनली आहे. लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या या नदीच्या...

ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘मिशन भरारी’; ५९ जण इस्रो अभ्यास दौऱ्यावर, शासनाकडून ५० लाखांचा निधी

0
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन भरारी’ या उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या इस्रो...
error: Content is protected !!