मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली असून सर्व पूर्वतयारीच्या कामांना वेग दिला गेला आहे.राज्य सरकारने राज्यातील अ, ब आणि क श्रेणीतील 10 प्रमुख महानगरपालिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेला गती देण्यासाठी 10 जून 2025 रोजी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार आणि छत्रपती संभाजीनगर या 10 महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचना तातडीने सुरू केली जाणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार, ज्यामध्ये 2024 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, त्यानुसार प्रत्येक प्रभागातून किमान 3 आणि कमाल 5 सदस्य निवडले जाणार आहेत. प्रभाग रचना शहराच्या जनगणनेनुसार जनसंख्येच्या आधारावर केली जाईल. तयार करण्यात येणाऱ्या प्रभागाची जनसंख्या ही सरासरीपेक्षा 10 टक्के अधिक किंवा कमी असू शकते. त्यापेक्षा जास्त फरक असेल, तर विशेष कारणांसह खुलासा द्यावा लागेल.प्रभाग रचनेची प्रक्रिया उत्तर दिशेपासून सुरू होऊन दक्षिणेकडे पूर्ण केली जाईल. प्रभागांच्या सीमारेषा ठरवताना रस्ते, नद्या, रेल्वे लाईन तसेच नैसर्गिक सीमा लक्षात घेतल्या जातील, असे महत्वपूर्ण आदेश राज्य सरकारने या वेळी जरी केले आहेत .























