Homeआरोग्यउल्हास नदी पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात, प्रदूषणाचा धोका वाढला

उल्हास नदी पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात, प्रदूषणाचा धोका वाढला

बदलापूर :- बदलापूर सह अंबरनाथ, उल्हासनगर,कल्याण, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आदी शहरी भागातील रहिवाशांची तहान भागविणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच जलपर्णीच्या विळख्यात सापडलेली दिसून येऊ लागली आहे.

ही उपद्रवी जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहेत. त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते. या उपद्रवी जलपर्णीला खालसा करण्याचे नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे कडवे आव्हान आहे.

ठाणे जिल्ह्यातील 50/60 लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. आसपासच्या कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी आणि नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी या दोन्हीमुळे जलचरांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत.

या उल्हास नदीच्या पाण्यावर शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगर पालिका अंवलबून आहेत, बदलापूर, कर्जत, अंबरनाथ, आणि पुढे कल्याण येथे फार्महाऊस, इमारतींमधील सांडपाणी, रसायन, जनावरांचे तबेले, शहरांतून निघणारे सांडपाणी, ड्रेनेज लाईन, यांचे प्रक्रिया न केलेले पाणी सरळ उल्हास नदीच्या पात्रात येत असल्याने जलपर्णी वाढत आहे.

22 मार्च 2025 रोजी जागतिक जलदिनी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, कैलाश शिंदे, श्रीनिवास घाणेकर, सुदाम गंगावणे या मंडळींनी नदी पात्रात बसून आंदोलन सुरू केले होते. 8 दिवसांनी राज्य शासनाद्वारे बैठक घेऊन 15 दिवसांत मशीन लावून जलपर्णी काढण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्याने आंदोलन समाप्त करण्यात आले होते.

अखेर स्वयंचलित मशीन लावून उल्हास नदीतील मोहना येथे जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम महाराष्ट्र प्रदुषण मंडळतर्फे करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा बदलापूर, रायते, कांब्याजवळ जलपर्णी जमा व्हायला सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात ती सर्वत्र पसरली जाईल, असे परिस्थितीवरून दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वानोवरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यातील पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली.

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

TCS महिला कर्मचाऱ्याच्या जामीन अर्जावर 25 मे रोजी सुनावणी होणार आहे

0
नाशिक : बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सहआरोपी असलेल्या टीसीएस महिला कर्मचाऱ्याने अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर...

तापमान वाढीमुळे अनेक भागात डासांची समस्या उद्भवते, रहिवाशांना नियमित फवारणी आणि चांगली स्वच्छता हवी...

0
पुणे: दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये डासांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे रहिवाशांनी, विशेषत: पाणवठ्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी नागरी प्रशासनाने नियमित धुरीकरण...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; उष्ण दिवस आणि उकाड्याने पुण्याची पकड

0
पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

0
‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

वानोवरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यातील पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली.

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

TCS महिला कर्मचाऱ्याच्या जामीन अर्जावर 25 मे रोजी सुनावणी होणार आहे

0
नाशिक : बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सहआरोपी असलेल्या टीसीएस महिला कर्मचाऱ्याने अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर...

तापमान वाढीमुळे अनेक भागात डासांची समस्या उद्भवते, रहिवाशांना नियमित फवारणी आणि चांगली स्वच्छता हवी...

0
पुणे: दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये डासांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे रहिवाशांनी, विशेषत: पाणवठ्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी नागरी प्रशासनाने नियमित धुरीकरण...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; उष्ण दिवस आणि उकाड्याने पुण्याची पकड

0
पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

0
‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...
error: Content is protected !!