Homeआरोग्यउल्हास नदी पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात, प्रदूषणाचा धोका वाढला

उल्हास नदी पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात, प्रदूषणाचा धोका वाढला

बदलापूर :- बदलापूर सह अंबरनाथ, उल्हासनगर,कल्याण, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आदी शहरी भागातील रहिवाशांची तहान भागविणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच जलपर्णीच्या विळख्यात सापडलेली दिसून येऊ लागली आहे.

ही उपद्रवी जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहेत. त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते. या उपद्रवी जलपर्णीला खालसा करण्याचे नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे कडवे आव्हान आहे.

ठाणे जिल्ह्यातील 50/60 लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. आसपासच्या कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी आणि नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी या दोन्हीमुळे जलचरांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत.

या उल्हास नदीच्या पाण्यावर शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगर पालिका अंवलबून आहेत, बदलापूर, कर्जत, अंबरनाथ, आणि पुढे कल्याण येथे फार्महाऊस, इमारतींमधील सांडपाणी, रसायन, जनावरांचे तबेले, शहरांतून निघणारे सांडपाणी, ड्रेनेज लाईन, यांचे प्रक्रिया न केलेले पाणी सरळ उल्हास नदीच्या पात्रात येत असल्याने जलपर्णी वाढत आहे.

22 मार्च 2025 रोजी जागतिक जलदिनी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, कैलाश शिंदे, श्रीनिवास घाणेकर, सुदाम गंगावणे या मंडळींनी नदी पात्रात बसून आंदोलन सुरू केले होते. 8 दिवसांनी राज्य शासनाद्वारे बैठक घेऊन 15 दिवसांत मशीन लावून जलपर्णी काढण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्याने आंदोलन समाप्त करण्यात आले होते.

अखेर स्वयंचलित मशीन लावून उल्हास नदीतील मोहना येथे जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम महाराष्ट्र प्रदुषण मंडळतर्फे करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा बदलापूर, रायते, कांब्याजवळ जलपर्णी जमा व्हायला सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात ती सर्वत्र पसरली जाईल, असे परिस्थितीवरून दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महारेराने प्रक्रिया जलद करण्यासाठी एसओपी जारी केल्यानंतर दोन महिन्यांनंतरही घर खरेदीदार रिकव्हरी वॉरंटच्या अंमलबजावणीची...

0
पुणे: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) प्रक्रिया जलद करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मानक कार्यप्रणाली (एसओपी) सुरू करूनही वसुली वॉरंट अद्यापही अंमलबजावणीच्या टप्प्यावरच रखडल्याने, थकबाकीदार...

मराठा महोत्सवात “शिवशंभू शौर्यगाथा”

0
बदलापूर: सकल मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने यंदाही बदलापुरात मराठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या...

‘डबल स्टँडर्ड्स’: काँग्रेसने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा टिपू सुलतानची ‘स्तुती’ करणारा व्हिडिओ पोस्ट...

0
हर्षवर्धन सपकाळ (पीटीआय प्रतिमा) पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने सोमवारी...

23 विलीन झालेल्या क्षेत्रांसाठी राखीव निधी वळवण्याच्या PMC च्या हालचालीवर टीका होत आहे

0
पुणे : 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 5 कोटी रुपये नव्याने विलीन झालेल्या भागात ड्रेनेज पुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने...

म्हाळुंगे संकुलातील दूषित पाणीपुरवठ्याप्रकरणी पीएमसीची कारणे दाखवा नोटीस, विकासकाला एक लाख रुपयांचा दंड

0
पुणे: म्हाळुंगे संकुलातील मालमत्ता मालकांना दूषित पाणी पुरवठा केल्याप्रकरणी नागरी संस्थेने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि VTP एथेरियसच्या व्यवस्थापक/विकासकाला 1 लाख रुपयांचा दंड...

महारेराने प्रक्रिया जलद करण्यासाठी एसओपी जारी केल्यानंतर दोन महिन्यांनंतरही घर खरेदीदार रिकव्हरी वॉरंटच्या अंमलबजावणीची...

0
पुणे: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) प्रक्रिया जलद करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मानक कार्यप्रणाली (एसओपी) सुरू करूनही वसुली वॉरंट अद्यापही अंमलबजावणीच्या टप्प्यावरच रखडल्याने, थकबाकीदार...

मराठा महोत्सवात “शिवशंभू शौर्यगाथा”

0
बदलापूर: सकल मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने यंदाही बदलापुरात मराठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या...

‘डबल स्टँडर्ड्स’: काँग्रेसने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा टिपू सुलतानची ‘स्तुती’ करणारा व्हिडिओ पोस्ट...

0
हर्षवर्धन सपकाळ (पीटीआय प्रतिमा) पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने सोमवारी...

23 विलीन झालेल्या क्षेत्रांसाठी राखीव निधी वळवण्याच्या PMC च्या हालचालीवर टीका होत आहे

0
पुणे : 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 5 कोटी रुपये नव्याने विलीन झालेल्या भागात ड्रेनेज पुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने...

म्हाळुंगे संकुलातील दूषित पाणीपुरवठ्याप्रकरणी पीएमसीची कारणे दाखवा नोटीस, विकासकाला एक लाख रुपयांचा दंड

0
पुणे: म्हाळुंगे संकुलातील मालमत्ता मालकांना दूषित पाणी पुरवठा केल्याप्रकरणी नागरी संस्थेने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि VTP एथेरियसच्या व्यवस्थापक/विकासकाला 1 लाख रुपयांचा दंड...
error: Content is protected !!