Homeताज्या बातम्याअंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काने ५२ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

अंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काने ५२ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने मिळाले नियुक्तीपत्र

आमदार किणीकर आणि मुख्याधिकार्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

अंबरनाथ (दर्शन सोनवणे ) : नगरपालिकेतील सेवानिवृत्त, मयत, स्वेच्छानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर वारसा हक्काने सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. बुधवारी (ता.२५) रोजी आमदार डॉ.बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते निकषांची पूर्तता करणाऱ्या ५२ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कर्मचारी पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्याचे प्रकरण मागील अनेक वर्षे न्यायप्रविष्ठ होते. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनेक वर्षे सफाई कामगार पदावर नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने लाड समितीच्या शिफारशीनुसार अंबरनाथ नगरपालिकेतील सेवानिवृत्त, मयत, स्वेच्छानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कर्मचारी नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये १३६ पैकी नियुक्तीच्या निकषांची पूर्तता केलेल्या एकूण ५२ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क पध्दतीने गट ‘ड’ अंतर्गत सफाई कामगार पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अनेक वर्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसांना नियुक्ती पत्र मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आंनद दिसून आला. तर इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी देखील आवश्यक निकष आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना देखील लवकरच नियुक्ती पत्र देण्यात येईल, तसेच त्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटी सोडवण्यासाठी येत्या सोमवारी पालिकेत कॅम्प देखील घेण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी उप नगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्यासह इतर माजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी कर्मचारी, तसेच नवनियुक्त सफाई कामगार आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यातील गृहनिर्माण संस्थांना यापुढे पुनर्विकासासाठी रजिस्ट्रारकडून एनओसीची आवश्यकता नाही

0
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थांना यापुढे पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यासाठी निबंधकांकडून ना हरकत प्रमाणपत्राची...

IUCAA ची सह-स्थापना करणारे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ नरेश दधीच यांचे बीजिंग येथे भेटीदरम्यान 81 व्या...

0
पुणे: प्रख्यात खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि अजित केंभवी यांच्यासमवेत पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ची सह-स्थापना करणारे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ...

महिनाभरात पुण्यातील दुसऱ्या मालमत्ता प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पुणे बातम्या

0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ याच्याशी निगडीत असलेल्या खासगी कंपनीचा मुंढवा जमीन व्यवहार हा महिनाभरातील पुण्यातील दुसरा वादग्रस्त...

जयकुमार रावल यांनी शहरातील जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेत नैतिक, मानव-केंद्रित नवोपक्रमाचे आवाहन केले

0
पुणे: पुढील दशक केवळ तंत्रज्ञानामुळे घडणार नाही, तर आपण ते कसे वापरायचे यावरून नैतिकतेने निवडले जाईल, असे प्रतिपादन पणन आणि प्रोटोकॉल राज्यमंत्री जयकुमार रावल...

अंकुर तिवारी म्हणतात, एआय-चालित अनुभव ही लवकरच व्यवसायाची गरज बनतील पुणे बातम्या

0
पुणे: AI-प्रेरित डिजिटल इनोव्हेटर अंकुर तिवारी यांचा विश्वास आहे की डिजिटल अर्थव्यवस्थेत भरभराट करू इच्छिणाऱ्या व्यवसायांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही यापुढे पर्याय नसून...

राज्यातील गृहनिर्माण संस्थांना यापुढे पुनर्विकासासाठी रजिस्ट्रारकडून एनओसीची आवश्यकता नाही

0
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थांना यापुढे पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यासाठी निबंधकांकडून ना हरकत प्रमाणपत्राची...

IUCAA ची सह-स्थापना करणारे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ नरेश दधीच यांचे बीजिंग येथे भेटीदरम्यान 81 व्या...

0
पुणे: प्रख्यात खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि अजित केंभवी यांच्यासमवेत पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ची सह-स्थापना करणारे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ...

महिनाभरात पुण्यातील दुसऱ्या मालमत्ता प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पुणे बातम्या

0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ याच्याशी निगडीत असलेल्या खासगी कंपनीचा मुंढवा जमीन व्यवहार हा महिनाभरातील पुण्यातील दुसरा वादग्रस्त...

जयकुमार रावल यांनी शहरातील जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेत नैतिक, मानव-केंद्रित नवोपक्रमाचे आवाहन केले

0
पुणे: पुढील दशक केवळ तंत्रज्ञानामुळे घडणार नाही, तर आपण ते कसे वापरायचे यावरून नैतिकतेने निवडले जाईल, असे प्रतिपादन पणन आणि प्रोटोकॉल राज्यमंत्री जयकुमार रावल...

अंकुर तिवारी म्हणतात, एआय-चालित अनुभव ही लवकरच व्यवसायाची गरज बनतील पुणे बातम्या

0
पुणे: AI-प्रेरित डिजिटल इनोव्हेटर अंकुर तिवारी यांचा विश्वास आहे की डिजिटल अर्थव्यवस्थेत भरभराट करू इच्छिणाऱ्या व्यवसायांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही यापुढे पर्याय नसून...
error: Content is protected !!