Homeताज्या बातम्याअंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अंबरनाथ : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा जाहीर करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्देशांचे अनुपालन करण्यासाठी शासनाला पुन्हा अधिसूचना काढावी लागली. त्यानुसार राज्य शासनाने १३ जून रोजी अधिसूचना काढून आरक्षण सोडत सभा पुन्हा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ जुलै पर्यंत २०२५ ते २०३० या कालावधीसाठी पुन्हा आरक्षण सोडत सभा आयोजित करण्याचे निर्देश होते. शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात फेर आरक्षण सोडत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींची पुन्हा आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २ अनुसूचित जाती, ३ अनुसूचित जमाती तर ८ ग्रामपंचायत मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव, तसेच सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग ८ आणि सर्वसाधारण प्रवर्ग ७ अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली.

सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी मंगळवारी जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत अंबरनाथ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. ज्यामुळे अनेक गावांमध्ये उत्साहाचे तर काही ठिकाणी राजकीय समीकरणांची नव्याने जुळवाजुळव सुरू होणार आहे.

महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित आरक्षण सोडत सभेत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ट्या काढून तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही सोडत सभा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार अमित पुरी यांच्या उपस्थितीत शांततामय वातावरणात पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. मात्र या पुन्हा घेतलेल्या आरक्षण सोडतीनंतर कही खुशी, कही गम अशी परिस्थिती तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये पहायला मिळाली.

सोडतीवेळी विविध गावांतील संभाव्य उमेदवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील निम्या ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण खालील प्रमाणे

अनुसूचित जाती प्रवर्ग (2)
बुर्दुल (स्त्री)
साई

अनुसूचित जमाती (३)
डोणे (स्त्री)
मांगरुळ
सागांव

नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग (८)
गोरेगांव (स्त्री)
ढवळे कुडसावरे (स्त्री)
खरड (स्त्री)
काकोळे (स्त्री)
हाजीमलंगवाडी
चामटोली
मुळगांव
सावरे

सर्वसाधारण प्रवर्ग महिला (८)
ढोके-दापीवली
उसाटणे
रहाटोली
काराव
नाहेण
अस्नोली
आंबेशिव बु
चरगांव

सर्वसाधारण प्रवर्ग (७)
नेवाळी
पोसरी
कान्होर
कासगांव
वांगणी
चोण
दहिवली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बदलापूरमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी सिग्नल यंत्रणा बंद; वाहनचालकांना दिलासा

0
बदलापूर:- एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यभरासह बदलापूर शहरातही उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

उल्हास नदी प्रदूषणावर ड्रोनची नजर; बदलापूरमध्ये कारवाईला वेग

0
बदलापूर:- उल्हास नदी सध्या वाढत्या प्रदूषणामुळे गंभीर संकटात सापडली असून, बदलापूर परिसरातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक बनली आहे. लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या या नदीच्या...

ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘मिशन भरारी’; ५९ जण इस्रो अभ्यास दौऱ्यावर, शासनाकडून ५० लाखांचा निधी

0
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन भरारी’ या उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या इस्रो...

पुण्यात वंदे भारतचा डबा रुळावरून घसरला; कोणालाही दुखापत झाली नाही, सेवा प्रभावित

0
पुणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा डबा सोमवारी सायंकाळी 7.15 च्या सुमारास पुणे स्थानकात दाखल होत असताना रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे दरम्यानची मुख्य...

बदलापूरमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी सिग्नल यंत्रणा बंद; वाहनचालकांना दिलासा

0
बदलापूर:- एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यभरासह बदलापूर शहरातही उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

उल्हास नदी प्रदूषणावर ड्रोनची नजर; बदलापूरमध्ये कारवाईला वेग

0
बदलापूर:- उल्हास नदी सध्या वाढत्या प्रदूषणामुळे गंभीर संकटात सापडली असून, बदलापूर परिसरातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक बनली आहे. लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या या नदीच्या...

ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘मिशन भरारी’; ५९ जण इस्रो अभ्यास दौऱ्यावर, शासनाकडून ५० लाखांचा निधी

0
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन भरारी’ या उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या इस्रो...

पुण्यात वंदे भारतचा डबा रुळावरून घसरला; कोणालाही दुखापत झाली नाही, सेवा प्रभावित

0
पुणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा डबा सोमवारी सायंकाळी 7.15 च्या सुमारास पुणे स्थानकात दाखल होत असताना रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे दरम्यानची मुख्य...
error: Content is protected !!